त्यांना शिवसेना संपवायची आहे, आदित्य ठाकरेंचा आरोप

107

सोमवारी शिंदे-भाजप सरकारचा विश्वासदर्शक ठरावात विजय झाला आहे. त्यामुळे आता शिंदे-भाजप सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. पण यावरुन आता शिवसेनेकडून सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. जे आमदार सोडून गेले आहेत त्यांना शिवसेना संपवायची आहे, पण शिवसेना संपणार नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला आहे.

शिवसेना संपणार नाही

शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी काढलेला व्हिप शिंदे गटातील आमदारांनी झुगारला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. जे आमदार सोडून गेले आहेत त्यांना शिवसेना संपवायची आहे. पण शिवसेना कधीही संपली नाही आणि संपणार नाही. जेव्हा या आमदारांचा सामना त्यांच्या मतदारांशी होईल तेव्हा त्यांना वस्तुस्थिती कळेल, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेना दुबळी नाही, याही पेक्षा मोठी ताकद घेऊन शिवसेना विधान भवनात प्रवेश करेल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचाः अजित पवार म्हणतात, देवेंद्र फडणवीस सर्वात नशीबवान आमदार)

जे आमदार शिवसेना सोडून गेले आहेत. जे आपल्या जन्मपक्षात असं काही करू शकतात, ते कर्मपक्षातही करू शकतात. त्यामुळे ते ज्या पक्षात गेले आहेत, त्यांनी सुद्धा सावध रहावं ,असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.