
1 of 7

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) मंगळवारी (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे.

पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली. (Pahalgam Terror Attack)

दहशतवाद्यांपैकी 5 ते 7 जण पाकिस्तानचे असल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला शंका येऊ नये म्हणून स्थानिक भाषेत संवाद साधला जात होता. त्यामुळे केंद्र सरकार आता कोणतं पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Pahalgam Terrorist Attack)

दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून, सर्च ऑपरेशन राबवण्यात येतं आहे. ड्रोन द्वारे परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत. (Pahalgam Terrorist Attack)
Pahalgam Terror Attack
Join Our WhatsApp Community