-
ऋजुता लुकतुके
एनबीसीसी कंपनीने गुरुवारी देशभरातील त्यांच्या पुनर्वसन प्रकल्पांची घोषणा केली आहे. त्यानंतर कंपनीचा शेअर एका दिवसांत ४ टक्क्यांनी वर आला. कंपनीने गोवा, तेलंगाणा आणि जम्मू व काश्मीर या राज्यांत तिथल्या राज्य सरकाराच्या भागिदारीत पुनर्वसन प्रकल्पांची घोषणा केली आहे. इतकंच नाही तर आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीला १२,००० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. २०२९ पर्यंत हा महसूल २९,००० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं उद्दिष्टंही कंपनीने जाहीर केलं आहे.
यातील पहिला प्रकल्प गोव्यातील १०,००० कोटींचा आहे. या प्रकल्पातील सगळा पैसा एनबीसीसी कंपनी गुंतवणार आहे. तर टप्प्या टप्प्याने हा प्रकल्प उभा राहणार आहे. तसंच या प्रकल्पातून पैसाही उभा राहणार असल्याचा कंपनीचा विश्वास आहे. त्यामुळेच गुरुवारी या शेअरमध्ये २ टक्क्यांची वाढ दिसून आली. बाजार बंद होताना हा शेअर ९७.७३ वर बंद झाला. या आठवड्यात हा शेअर तब्बल १९ टक्क्यांनी वाढला आहे.
(हेही वाचा – RedMi A5 : मोठी बॅटरी आणि 32 मेगा पिक्सेलचा कॅमेरा असलेला हा रेडमीचा किफायतशीर फोन भारतात लाँच)
कंपनीच्या चौथ्या तिमाहीचे निकाल अजून जाहीर झालेले नाहीत. पण, आधीच्या तिमाहीत कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत नफ्यात २५ टक्के वाढ नोंदवली आहे. मार्च २०२५ मध्ये कंपनीला उत्तराखंड सरकारने ४२३ कोटी रुपयांची एक बांधकामाची ऑर्डर दिली आहे. तर कंपनीच्या खात्यात आणखीही चांगले प्रकल्प आहेत. अलीकडेच त्यांनी २२,५०० कोटी रुपयांचा आम्रपाली गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण केला आहे.
मागच्या एका महिन्यात कंपनीचा शेअर २२ टक्क्यांनी वाढला आहे. पण, मागच्या सहा महिन्यात हा शेअर १० टक्क्यांनी खाली आला होता. आताही जाणकारी मतं विभागलेली आहेत. या शेअरचा अभ्यास करणाऱ्या संशोधन कंपन्यांपैकी ३३ टक्के कंपन्यांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. पण, त्यांचं सरासरी लक्ष्य १०० रुपये इतकं आहे.
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट कुठल्याही शेअरमध्ये खरेदी – विक्रीचा सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community