Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉय यांची दीड कोटींची फसवणूक; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

117
Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉय यांची दीड कोटींची फसवणूक; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) आणि त्याची पत्नी प्रियांका ओबेरॉय यांची तब्बल दीड कोटींची फसवणूक झाली आहे. विवेक ओबेरॉय यांच्या सीए यांनी याबद्दल अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

विवेक आणि प्रियांका ओबेरॉय (Vivek Oberoi) यांची त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये भागीदार असणाऱ्या तीन जणांकडून फसवणूक झाली आहे. सीएने केलेल्या आरोपानुसार या तीन भागीदारांनी ओबेरॉयच्या वैयक्तिक खात्यातून केवळ पैसेच काढले नाहीत तर त्यांनी ओबेरॉय यांना नुकसान भरपाई देण्यासही नकार दिला आणि एकूण दीड कोटी रुपयांची फसवणूक केली.

अभिनेता विवेक ओबोरॉय (Vivek Oberoi) आणि त्याची पत्नी प्रियंका यांनी एप्रिल २०१७ मध्ये ऑबेरॉय ऑरगॅनिक एलएलपीची स्थापना केली, ही कंपनी सेंद्रिय उत्पादनांची खरेदी आणि विक्री करते. परंतु तीन वर्षांनंतर, बाजारात सेंद्रिय उत्पादनांना मागणी कमी असल्याने ते कंपनी बंद करण्याचा विचार करत होते.

यादरम्यान, अभिनेता विवेक ओबोरॉय (Vivek Oberoi) हे संजय दास यांच्या संपर्कात आले. संजय दास हा एक इव्हेंट आयोजित करत होता आणि चित्रपटांची निर्मिती करत होता. इव्हेंट आणि चित्रपट उद्योगातील त्यांचा अनुभव पाहून विवेक ओबेरॉय यांनी त्याच्यासोबत चित्रपट उद्योगातील कार्यक्रम आयोजित करण्याच्या व्यवसायासाठी भागीदारी केली.

फेब्रुवारी २०२० मध्ये, ओबेरॉय (Vivek Oberoi) आणि संजय अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवसाय करारावर चर्चा करण्यासाठी भेटले आणि अटी नियमांनुसार त्यांनी एक करार केला.

पोलिस तक्रारीनुसार, त्यांच्या परस्पर सामंजस्य आणि करारानुसार, जुलै आणि सप्टेंबर २०२० दरम्यान, ओबेरॉय (Vivek Oberoi) ऑरगॅनिक एलएलपीचा व्यवसायाचा उद्देश आणि नाव बदलून आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीमध्ये रूपांतरित केले गेले.

(हेही वाचा – Nuclear Power : देशाची अणुऊर्जा निर्मिती क्षमता वाढणार; अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचा दावा)

त्यांनतर संजय दास आणि त्याच्या आईचे नाव या आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीमध्ये भागीदार म्हणून जोडले गेले. तसेच प्रियांका ओबेरॉय यांना राजीनामा देण्यास भाग पाडून संजयच्या ओळखीच्या राधिकाचे नाव फर्ममध्ये भागीदार म्हणून जोडले गेले. नोव्हेंबर २०२१ पर्यंत, अभिनेत्याने आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीमध्ये ९५.७२ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

फेब्रुवारी २०२१ मध्ये, शाह आणि ओबेरॉय (Vivek Oberoi) यांनी ‘गणशे’ चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीला त्यासाठी साइन केले गेले आणि ओबेरॉयने त्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी यांना ५१ लाख रुपये दिले. दिग्दर्शक आणि लेखक यांनाही मोबदला दिला गेला. ओबेरॉय आणि संजय चित्रपटाच्या प्रसारणासाठी झी ५ च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चर्चा करत होते, असे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. २०२२ च्या सुरुवातीस, त्याच्या गुंतवणुकीचे तपशील पाहताना, ओबेरॉय यांनी निरीक्षण केले की संजयने निधीचा गैरवापर केला. जेव्हा अभिनेत्याने फर्मच्या व्यवस्थापकाशी चर्चा केली तेव्हा त्याने देखील त्यास दुजोरा दिला. संजय दास, नंदिता आणि राधिका यांनी विम्यासाठी पैसे देणे, दागिने खरेदी करणे, पगार काढणे इत्यादी वैयक्तिक खर्चासाठी कंपनीच्या ५८.५६ लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर केला, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे .

नंतर ओबेरॉयला (Vivek Oberoi) कळले की संजयने आनंदिता स्टुडिओ प्रा.लि. ही आणखी एक फर्म स्थापन केली. आनंदिता स्टुडिओ प्रा. लि., ‘गणशे’ चित्रपटाची निर्मिती करत होते. यानंतर अभिनेत्याने नवाजुद्दीन सिद्दीकीला या फसवणुकीबद्दल सांगितले, त्यानंतर सिद्दीकीने ओबेरॉयला ५१ लाख रुपये परत केले.अभिनेते आणि त्यांच्या कंपनीला विविध कार्यक्रम आणि कार्यक्रमांमध्ये ओबेरॉयच्या पाहुण्यांच्या उपस्थितीसाठी पैसे म्हणून मिळालेले ६० लाख रुपये देखील संजय आणि इतर आरोपींनी स्वतःच्या खिशात घातल्याचा आरोप या तक्रारीत केला गेला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी संजय दास त्याची आई नंदिता आणि राधिका यांच्यावर कलम ४०६ (गुन्हेगारी विश्वासभंग), ४०९ (लोकसेवक, बँकर, व्यापारी किंवा एजंट यांच्याकडून विश्वासघाताचा फौजदारी), ४२० (फसवणूक) अन्वये गुन्हा दाखल केला. ३४ (सामान्य हेतू) भारतीय दंड संहिता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.