-
प्रतिनिधी
पडघा-बोरिवली येथे २२ ठिकाणी एटीएसने सोमवारी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान एटीएसच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरून पडघा प्रकरणात तुर्की देशाचे कनेक्शन समोर येत आहे. तसेच, पडघ्यातील काही तरुण तुर्की येथे जाऊन आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या तरुणांची प्रवास हिस्ट्री तपासण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी एटीएसने ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरिवली येथे २२ संशयितांच्या निवास्थानी केलेल्या शोधमोहिमेदरम्यान एटीएसच्या हाती लागलेल्या कागदपत्रांमध्ये काही कागदपत्रे तुर्की देशाशी संबंधित सापडले असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे. (Padgha Search Operation)
(हेही वाचा – NIA : जागतिक दहशतवाद्यांमध्ये बोरिवली-पडघाची ओळख आहे इस्लामिक राष्ट्र; NIAच्या आरोपपत्रात गंभीर खुलासे)
एटीएसच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरून अशी धक्कादायक माहिती समोर येत की, पडघा येथील काही तरुणांनी तुर्की देशात प्रवास केल्याची शक्यता आहे. ही शक्यता पडताळून बघण्यासाठी एटीएसकडून या तरुणांची प्रवास हिस्ट्री तपासण्यात येत आहे. एटीएसकडून असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे की, तुर्की देशात गेलेल्या या तरुणांनी तुर्की देशात असलेल्या इसिस दहशतवादी संघटनेच्या काही प्रमुखांची भेट घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र एटीएसने २२ स्लिपर सेलची माहिती मिळवून त्यांच्या पडघा-बोरिवलीतील निवासस्थानी सोमवारी छापे टाकले होते. २२ जणांपैकी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून पाच जण हज यात्रेसाठी गेले असून पाच जण फरार असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे. (Padgha Search Operation)
(हेही वाचा – ISIS : ‘इसिस’ मध्ये भरती होणाऱ्या तरुणांना दिले जात होते हे तीन ‘बायथ’)
सिमी संघटनेवर बंदी आणल्यानंतर साकीब नाचन हा ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ अर्थात ‘इसिस’ या दहशतवादी संघटेचा महाराष्ट्र मॉड्युलचा प्रमुख बनला होता. या शोधमोहिमेदरम्यान एटीएसने मोबाईल हॅन्डसेट्स, तलवार, सुरा, मालमत्तेबाबतची संशयास्पद कागदपत्रे व दहशतवाद, रॅडीक्लायझेशन यास उत्तेजन देणारी आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे. एटीएस सूत्रांच्या म्हणण्यानुसार साकीब नाचन आणि त्याच्या समर्थकांना अटक केल्यानंतर नाचन आणि इतराच्या संपर्कात असलेल्या तसेच नाचन यांच्या भडकावू भाषणातून प्रेरित झालेल्या २२ जणांकडून राज्यात घातापाताची शक्यता होती, त्यामुळे ही छापेमारी करून १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानने भारतावर केलेल्या ड्रोन हल्ल्यातील ३५० ड्रोन तुर्की देशाचे होते. भारत पाकिस्तान युद्धात तुर्कीने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिल्याचे उघड झाले आहे. (Padgha Search Operation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community