शेवटी जे व्हायला नको होते तेच झाले; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली नाराजी

145

शनिवारी महाराष्ट्रात घडलेल्या प्रकारानंतर, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांकडून अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर, आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत, घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, कोणावरही हल्ला होऊ नये, राज्यात सगळे सुरक्षित असायला हवेत असही वक्तव्यही अजित पवार यांनी यावेळी केले.

..तरी अट्टाहास का?

पोलिसांनी न जाण्याची विनंती करुनही मातोश्रीवर जाण्याचा अट्टाहास का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मातोश्री बाहेर घडलेल्या प्रकारावर चिंता व्यक्त केली. गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मातोश्रीवर जाऊ नका असे राणा दाम्पत्याला सांगण्यात आले होते, मात्र त्यांनी ऐकले नाही. शेवटी जे व्हायला नको हो ते तेच झाले, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

कोणावरही हल्ला होता कामा नये

प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागायला हवे. राज्यकारभार करत असताना, सगळीकडे शांतताच राहायला हवी, कोणालाही त्रास होता कामा नये, ही भावना आहे. तपास यंत्रणा म्हणूनच पोलिसांचे काम आहे. ते त्यांचे काम करतील, केंद्राची सुरक्षा असो, नसो. कोणावरही हल्ला होता कामा नये. आपण पण कोणालाही उचकावण्याचा प्रयत्न करु नये. दुस-यावर राग काढण्याचे कारण काय, असा सावाल त्यांनी यावेळी केला आहे.

( हेही वाचा: माझा ‘मनसुख हिरेन’ करण्याचा सरकारचा तिसरा प्रयत्न फसला; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप )

शरद पवारांची हीच शिकवण

सगळ्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडायला हवी. राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका. राजकीय हस्तक्षेप कोणीही करु नये. असे झाले तर असे प्रश्न निर्माणच होणार नाहीत. आपण कारभार करत असताना, राज्य उत्तम पद्धतीने पुढे जावे, हीच शिकवण शरद पवार साहेबांनी दिल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.