ऐन थंडीत राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ अभिसरण स्थिती निर्माण झाली आहे. यासोबत समुद्रात तयार झालेला एक द्रोणीय भाग कच्छपर्यंत पसरला आहे. याची माहिती, हवामान तज्ज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली आहे. यामुळेच हवामान विभागाने येत्या २४ तासांत राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज व यलो अलर्ट
राज्यात अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहेत. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागांत हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात म्हणजेच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बीड व उस्मानाबाद या भागात हवामान विभागाने यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी या भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, असे हवामान तज्ज्ञ शुभांगी भुत्ते यांनी स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : मुंबईकरांनो सावधान! आगामी दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता )
मच्छिमारांनी सूचना
जोरदार पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे येत्या २४ तासांत मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1466011850919661568
Join Our WhatsApp Community