-
ऋजुता लुकतुके
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू आर. अश्विन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात अश्विनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रिकेट क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्याला हा सन्मान मिळाला आहे. अश्विन बरोबरच व्यतिरिक्त भारतीय हॉकी संघाचा माजी गोलकीपर पी.आर. श्रीजेश (PR Sreejesh) यांना पद्म भूषण पुरस्काराने (Padma Bhushan Award) सन्मानित करण्यात आले.
यावर्षी, २५ जानेवारी रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील एकूण १३९ प्रतिष्ठित व्यक्तींना नागरिक पुरस्कार – पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री – साठी नामांकित करण्यात आले होते. यापैकी ७१ जणांना २८ एप्रिल रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनाच्या भव्य दरबार हॉलमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्वरितांना पुढे वेगळ्या समारंभात पुरस्कार दिले जाणार आहेत.
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : “जणूकाही दहशतवादी तुम्हालाच विचारून …” ; Girish Mahajan यांनी शरद पवारांना सुनावले)
Congratulations to @ashwinravi99 on being conferred the prestigious Padma Shri award by the Hon’ble President of India @rashtrapatibhvn, honouring his remarkable achievements and an illustrious career with #TeamIndia pic.twitter.com/8HlYQx3Dsl
— BCCI (@BCCI) April 28, 2025
बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अश्विन यांचे अभिनंदन केले. या व्हिडिओमध्ये अश्विन यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेताना पाहायला मिळते. BCCI ने एक्स (माजी ट्विटर) वर लिहिले – भारताचे माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आर. अश्विन (Ravichandran Ashwin) यांचे हार्दिक अभिनंदन. हा पुरस्कार त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा आणि टीम इंडियासोबतच्या शानदार कारकिर्दीचा सन्मान आहे.
(हेही वाचा – IPL 2025, Vaibhav Suryavanshi : १४ व्या वर्षी आयपीएलमधील जलद शतक ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीविषयी जाणुन घ्या सर्वकाही …)
गौरव करण्यासारखी बाब म्हणजे, आर. अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. गाबा कसोटी संपल्यानंतर त्यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अश्विन यांनी एकूण ७६५ विकेट्स घेतल्या. त्यांनी सुमारे १४ वर्षे भारतीय क्रिकेट संघाची सेवा केली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ५३७ कसोटी विकेट्स, १५६ एकदिवसीय विकेट्स आणि ७२ टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या. ते २०११ च्या वर्ल्ड कप (World Cup) आणि २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. अनिल कुंबळेनंतर (Anil Kumble) भारतासाठी सर्व फॉरमॅट्समध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे दुसरे खेळाडू म्हणून त्यांनी आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community