पेहलगाम हल्ल्यानंतर आता पाकिस्तानला भारताकडून सैनिक कारवाई होण्याची धडकी भरली आहे. रात्र-दिवस पाकिस्तानी जनता, सैन्य आणि दहशतवादी ‘दहशती’ च्या सावटाखाली वावरत आहेत. भारतीय सैन्य दहशतवाद्यांचे (Terrorist) ठिकाणे लक्ष्य करतील म्हणून त्यांनी चक्क ती ठिकाणी सोडून पोबारा केला आहे. विशेष हे दहशतवादी मदरसे आणि मशिदींमध्ये राहत होते, आता त्यांना तेथूनही बाहेर काढण्यात आले आहे.
(हेही वाचा Pakistan : देशभरातून पाकिस्तानी मायदेशी परतत असताना केरळ मात्र ‘त्या’ तीन पाकड्यांना ठेवून घेणार)
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने हवाई कारवाई करून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची लाँच पॅड उदध्वस्त केली होती. अशाच कारवाईची धास्ती आता दहशतवाद्यांना (Terrorist) वाटत आहे. म्हणून गिलगिट बाल्टिस्तानमधील मशिदी ओस पडल्या आहेत. तीन दिवसांत या ठिकाणांवर राहत असलेले दहशतवादी हटविण्यात आले आहेत. भारत कोणत्याही क्षणी हल्ला करेल म्हणून पाकिस्तानी सैन्य गिलगिट बाल्टिस्तानमध्ये तैनात केले जात आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून तेथील मदरसे, मशिदींमध्ये राहत असलेल्या दहशतवाद्यांना (Terrorist) बाहेर काढण्यात आले आहे. दहशतवाद्यांचे म्होरके देखील पळाले आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्याही सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पीओके भारत ताब्यात घेण्यासाठी कारवाई करेल असेही पाकिस्तानला वाटत आहे. यामुळे तिथे युद्ध भडकू शकते, या शक्यतेने तेथील कर्मचाऱ्यांना, हॉस्पिटलना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community