पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या निर्घृण आतंकवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल अनेक पावले उचलली आहेत. (Pahalgam Terror Attack) त्यामध्ये भारताने सिंधू जल कराराला (Indus Water Treaty) स्थगिती दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी याविषयी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी पाकिस्तान (Pakistan) आणि काँग्रेसला कडक संदेश दिला आहे.
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : सोशल मीडियावर संतापाचा भडका, “मोदीजी, ‘मन की बात’ पुरे झाली आता थेट गन की बात”)
पहला सिंधु समझौता 1950 में हुआ था। जो १९५२ में पाकिस्तान ने तोड़ दिया। इसके पश्चात चाचा नेहरू की कृपा से १९६० में दूसरा समझौता किया, जिसमें हमने ८०% पानी उन्हें भीख में दिया, बगैर किसी कीमत चुकाए। आज वो इस भीख को हक समझ रहे है।
अरे भीख दे न दे, हमारी मर्जी!— Ranjit Savarkar (@RanjitSavarkar) April 24, 2025
रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी म्हटले आहे की, पहिला सिंधू करार १९५० मध्ये झाला होता. तो १९५२ मध्ये पाकिस्तानने मोडला. त्यानंतर चाचा नेहरूंच्या कृपेने वर्ष १९६० मध्ये दुसरा करार झाला, ज्यामध्ये आम्ही पाकिस्तानला ८० टक्के पाणी भीक म्हणून दिले, कोणतीही किंमत न घेता. आज ते या भिकेला त्यांचा हक्क समजत आहेत. अरे, भीक द्यायची, नाही द्यायची, आमची इच्छा !
या ट्विटनंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काही लोक रणजित सावरकरांच्या विधानाला “राष्ट्रवादी विचारांची प्रेरणा”, असे म्हणत आहेत.
सिंधू जल करार काय आहे?
१९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये सिंधू जल करार झाला. या करारानुसार, भारताला तीन पूर्वेकडील नद्या – बियास, रावी आणि सतलजवर अधिकार मिळाले, तर पाकिस्तानला तीन पश्चिमेकडील नद्या – सिंधू, झेलम आणि चिनाबचा मुख्य वापर मिळाला. भारत या पश्चिमेकडील नद्यांचा वापर मर्यादित प्रमाणात सिंचन, वीज आणि इतर घरगुती गरजांसाठी करू शकतो.
सिंधू जल करार रद्द करता येईल का?
अलिकडच्या काळात, पाकिस्तानसोबतच्या बिघडत्या संबंधांमुळे, भारत सरकारने सिंधू पाणी कराराचा आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. तथापि, ते काढून टाकणे ही एक आंतरराष्ट्रीय कायदेशीर आणि राजकीय प्रक्रिया आहे. (Pahalgam Terror Attack)