वेंकट यांचं खरं नाव श्रीनिवासराघवन वेंकटराघवन असं होतं. वेंकटराघवन यांचा जन्म २१ एप्रिल १९४५ रोजी मद्रास, मद्रास प्रेसिडेन्सी येथे एका तमिळ अय्यंगार कुटुंबात झाला. त्यांनी पी. एस. हायस्कूल मैलापूर येथे शिक्षण घेतले. त्यांनी चेन्नईतील गिंडी येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. (Venkat Raghavan)
वेंकट हे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि पंच आहेत. ते उजव्या हाताचे ऑफ-ब्रेक गोलंदाज आणि खालच्या फळीतील फलंदाज होते. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे १९७५ आणि १९७९ मध्ये पहिल्या दोन आयसीसी क्रिकेट विश्वचषकांमध्ये संघाचे नेतृत्व केले. (Venkat Raghavan)
(हेही वाचा – Indian army : आता सियाचीनमध्येही थेट 5 जी नेटवर्क ; सैनिकांना कुटुंबीयांशी बोलता येणार !)
त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द १८ वर्षांहून अधिक काळ चालली. ते सर्वात जास्त काळ क्रिकेट कारकीर्द गाजवणारे भारतीय क्रिकेटपटू होते. ते बिशन सिंग बेदी, ईएएस प्रसन्ना आणि बीएस चंद्रशेखर यांच्यासोबत भारतातील प्रसिद्ध फिरकी पथकाचा एक भाग होते, ज्यांनी दशकाहून अधिक काळ जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. त्यांनी ५७ कसोटी सामने खेळले, १५६ विकेट्स घेतल्या आणि १५ एकदिवसीय सामन्यांमध्येही त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. (Venkat Raghavan)
खेळातून निवृत्त झाल्यानंतर, ते एक पंच म्हणून काम करत होते. त्यांनी ७३ कसोटी सामने आणि ५२ एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे. २००३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना सी.के. पुरस्कार मिळाला आहे. २००४ मध्ये त्यांना नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आज त्यांचा जन्मदिन. त्यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. (Venkat Raghavan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community