radhanagari dam : राधानगरी धरण; एका धरणाने बदलला कोल्हापूरच्या शेतीचा इतिहास!

84
radhanagari dam : राधानगरी धरण; एका धरणाने बदलला कोल्हापूरच्या शेतीचा इतिहास!

राधानगरी धरण हे महाराष्ट्र राज्यातल्या कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या राधानगरी गावाजवळच्या भोगावती नदीवर असलेलं एक धरण आहे. १८ फेब्रुवारी १९०७ साली राजर्षी शाहू महाराजांनी या धरणाचं बांधकाम सुरू केलं होतं. या धरणाचा उपयोग जल सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी केला जात आहे. हे धरण दाट जंगलाच्या परिसरात वसलेलं आहे. (radhanagari dam)

सर हेन्री हॉवर्ड (ओ. आय. ई., एम. सी., एम. आय. ई. ई.) यांच्या तपासणी अहवालाच्या संदर्भानुसार या धरणाची योजना पांडुरंगराव कृष्णाजीराव शिंदे (एस्क्युअर, बीए, आय. एस. ई.) यांनी सुचवली होती. १५००० हेक्टरपर्यंत सिंचित जमीन वाढवण्यासाठी आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सुचवलेला फायदा लक्षात घेऊन ज्यांनी थर्मो-इलेक्ट्रिक आणि खाण प्रकल्पाची योजना आखली होती, त्यासाठी उभारलेलं भाग भांडवल संबंधित भागधारकांना परत करण्यात आलं. (radhanagari dam)

(हेही वाचा – IPL 2025, Bat Check : ‘पुढेही हेच होत राहणार,’ सामना थांबवून बॅट तपासण्यावर बीसीसीआयची स्पष्टोक्ती)

कृष्णाजीराव शिंदे यांच्या सूचनेमुळे गुंतवलेल्या भांडवलाची पूर्तता झाल्यानंतर लोकांच्या हितासाठी ही योजना सरकारकडे सोपवण्यात आली. तर सर विश्वेश्वरय्या यांच्या मतानुसार राजाराम महाराजांनी या योजनेला मान्यता दिली. नाहीतर ब्रिटिश औद्योगिक सिंडिकेटच्या बाजूने औष्णिक विद्युत प्रकल्प झाला असता. १९४१ साली पी.के. शिंदे यांची तांत्रिक क्षमता आणि अनुभवामुळे त्यांची मुख्य अभियंता म्हणून विशेष नियुक्ती करण्यात आली. आज राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेती आणि गूळ उद्योगाच्या भरभराटीचं मुख्य कारण आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची पाण्याची गरज याच धरणाद्वारे पूर्ण केली जाते. (radhanagari dam)

राधानगरी धरण हे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांना आधार देतं. हे धरण घनदाट जंगलाने वेढलेलं आहे. तसंच त्यांत वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव आणि नैसर्गिकरित्या विकसित झालेले आहेत. श्रीयुत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे थर्मो-इलेक्ट्रिक प्रकल्प आणि धातूंचे खाणकाम बाजूला ठेवण्यात आलं. राधानगरी धरण हे फक्त अभ्यास करण्यासारखं तंत्रज्ञानच नाही तर या धरणाला एक इतिहास देखील आहे. या धरणामुळे कोल्हापूरमधल्या शेतीचं भवितव्यच बदलून गेलं. (radhanagari dam)

(हेही वाचा – Sanatan Sanstha : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !)

राधानगरी इथल्या धरणाची वैशिष्ट्ये

राधानगरी इथलं धरण त्याच्या स्वयंचलितपणे चालणाऱ्या ७ दरवाज्यांसाठी प्रसिद्ध आहे. या धरणाचे दरवाजे उघडझाप करण्यासाठी कोणत्याही विद्युत किंवा यांत्रिक उर्जेची आवश्यकता नाही. आतापर्यंत हे तंत्रज्ञान भारतातल्या कोणत्याही धरणात वापरण्यात आलेलं नाही. ७ स्वयंचलित दरवाज्यांव्यतिरिक्त या धरणामध्ये पाच हाताने चालवले जाणारे दरवाजे आहेत. राधानगरी धरणाची उंची ४२.६८ मीटर म्हणजेच १४०.० फूट एवढी आहे. तर लांबी १,१४३ मीटर मीटर ३,७५० फूट एवढी आहे. राधानगरी धरणाची पाण्याची एकूण साठवण क्षमता २३६,८१०,००० मीटर म्हणजेच ८.३६३×१०९ घन फूट एवढी आहे. (radhanagari dam)

राधानगरी धरण बांधण्यामागचा उद्देश
  • शेतीचं जल सिंचन
  • कोल्हापूर शहराची पाण्याची गरज पुरवणं
  • जलविद्युत निर्माण करणं

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.