
नव्या शैक्षणिक धोरणानुसार (National Education Policy) शालेय अभ्यासक्रमात भाषासंवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता १ ते ५ मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (National Education Policy) राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी, इंग्रजीबरोबरच हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे. (National Education Policy)
हेही वाचा-चौंडी विकास आराखड्याला गती द्या! सभापती Ram Shinde यांचे निर्देश; मंत्रिमंडळाची बैठकही होणार
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यापुढे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार आहेत. (National Education Policy)
हेही वाचा- Feeding to Animals and Birds : आयते अन्न-पाणी देऊन प्राण्यांची जीवनशैली बिघडवू नका !
पायाभूत स्तर : वय ३ ते ८ वर्ष – बालवाटिका – १, २, ३, तसेच इयत्ता पहिली व दुसरी
पूर्वतयारी स्तर : वय ८ ते ११ वर्ष – इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी
पूर्व माध्यमिक स्तर : वय ११ ते १४ – इयत्ता सहावी, सातवी व आठवी
माध्यमिक स्तर : वय १४ ते १८ – इयत्ता नववी ते बारावी
अशी होणार अंमलबजावणी (National Education Policy)
२०२५-२६ इयत्ता १
२०२६-२७ इयत्ता २, ३, ४ आणि ६
२०२७-२८ इयत्ता ५, ७, ९ आणि ११
२०२८-२९ इयत्ता ८, १० आणि १२
हेही पहा-
Join Our WhatsApp Community