पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबाची कानपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)नी भेट घेतली. शुभम द्विवेदीच्या कुटुंबाला भेटल्यानंतर पंतप्रधान मोदीं(Narendra Modi)नी जाहीर सभेत याचा उल्लेख केला. ते म्हणाले, पाकिस्तानचा कोणताही खेळ आता चालणार नाही. कानपूरिया शैलीत पंतप्रधान म्हणाले, शत्रू कुठेही असेल तरी त्याचा पराभव होईल.(Narendra Modi)
दरम्यान, पंतप्रधान मोदीं(Narendra Modi)नी शुक्रवार, ३० मे २०२५ दिवशी कानपूरच्या चकेरी विमानतळावर उद्योगपती शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शुभम यांच्या पत्नी ऐशन्या, वडील संजय आणि आई सीमा यांच्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी आयोजित येथील जाहीर सभेत दहशतवादाविरोधी धोरणाचा पुनरुच्चार करत ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर शुभमची पत्नी ऐशन्या यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, पंतप्रधानांना भेटून असे वाटले की घरातील ज्येष्ठ व्यक्ती ज्याप्रमाणे आपल्या डोक्यावर हात ठेवते. याभेटीत पंतप्रधानां(Narendra Modi)नी दहशतवादाविरुद्धची लढाई आणखी तीव्र करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्या म्हणाल्या. सुमारे १० मिनिटे कुटुंबासोबत संवाद साधताना पंतप्रधान खूप दुःखी होते. त्या म्हणाल्या, दहशतवादी काश्मीरमधील वाढते पर्यटन आणि समृद्धी बिघडवू इच्छितात. तसेच, भविष्यातही कुटुंबाला भेटण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले, असे शुभम यांचे वडील संजय द्विवेदी यांनी सांगितले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे असे सांगतानाच पंतप्रधानांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचे सांत्वन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.(Narendra Modi)
Join Our WhatsApp Community