-
ऋजुता लुकतुके
साखळी स्पर्धेतील सर्व आव्हान पार करून बाद फेरी गाठल्यावर काही वेळा संघ बाद फेरीत आपलं सगळं काही द्यायला जातो. त्या नादात काहीच मनासारखं घडत नाही. आणि फक्त चुका घडतात. मोठ्या मोठ्या संघांच्या बाबतीत विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत असं होतं. फुटबॉल विश्वचषकात २०१२ मध्ये उपउपान्त्य फेरीत अर्जेंटिना सारखा बलाढ्य संघ जर्मनीकडून २-७ ने हरला होता. पंजाब किंग्जचं (Punjab Kings) पहिल्या पात्रता फेरीत असंच काहीसं झालं. नाणेफेक जिंकून बंगळुरू संघाने पहिली गोलंदाजी घेतली तेव्हा त्यांचा इरादा स्पष्ट होता. सुरुवातीला खेळपट्टीवर जी उसळी मिळेल तिचा फायदा घेऊन काही बळी मिळवायचे. त्यानंतर फलंदाजांवर सगळं काही सोपवायचं.
रजत पाटीदारची (Rajat Patidar) हाक बंगळुरूच्या सर्वच खेळाडूंनी ऐकली. क्षेत्ररक्षण चोख आणि गोलंदाजांनी तर अजिबात कसूर केली नाही. दुसऱ्या षटकापासून बळी जात राहिले. आणि १४.१ षटकांत त्यांचा अख्खा संघ १०१ धावांतच बाद झाला. मार्कस स्टॉईनिसने (Marcus Stoinis) सर्वाधिक २६ आणि तळाला ओमारझाईने १६ धावा केल्या. बाकी प्रभसिमरनच्या १८ धावा वगळल्या तर सगळ्यांनी एकेरी धावसंख्याच नोंदवली. कृणाल पांड्याचा (Krunal Pandya) अपवाद सोडला तर इतर सर्व बंगळुरू गोलंदाजांनी किमान एक बळी मिळवला. (IPL 2025, RCB in Final)
जोश हेझलवूड (Josh Hazlewood) आणि सुयश शर्मा (Suyash Sharma) यांनी प्रत्येकी तीन तर यश दयालने दोन गडी बाद केले. रोमारिओ शेफर्ड आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक गडी बाद केला.
(हेही वाचा – Assembly Session : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात होणार आश्वासनाची पूर्तता; अधिकाऱ्यांनी हजर राहणे अनिवार्य)
Say Hello to the first 𝐅𝐈𝐍𝐀𝐋𝐈𝐒𝐓𝐒 of #TATAIPL 2025 ❤#RCB fans, how elated are you? 🤩
Updates ▶ https://t.co/FhocIrg42l#PBKSvRCB | #Qualifier1 | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/gmnjZsFWxF
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2025
त्यानंतर गोलंदाजीत दाखवलेलं वर्चस्व बंगळुरूच्या फलंदाजांनीही कायम ठेवलं. विराट कोहली (Virat Kohli) आणि फील सॉल्ट (Phil Salt) या दोघांनाही विजयाची यथार्थ घाई झाली होती. तिसऱ्या षटकांत दोघांनी ३० धावा फलकावर लावल्या. पण, जेमिसनच्या एका स्विंग झालेल्या चेंडूवर विराट कोहली चकला. आणि १२ धावा करून तो बाद झाला. जेमिसनचं ते षटक वादळी ठरलं. त्याचा प्रत्येक चेंडू स्विंग झाला. आणि मयांक अगरवाल वारंवार चकला. पण, हे एक षटक सोडलं तर बंगळुरूच्या फलंदाजांनी धावा करणं सोडलं नाही. याच जेमिसनच्या पुढील षटकांत सॉल्टने २१ धावा जमा केल्या. (IPL 2025, RCB in Final)
जेमिसनने २७ चेंडूंत नाबाद ५६ धावा करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अंतिम फेरीत सुरक्षितपणे सोपवलं. मयंक अगरवालने १९ तर रजत पाटिदार १५ धावांवर नाबाद राहिला. सामन्यावर संपूर्ण वर्चस्व राखत बंगळुरू संघाने फक्त दुसऱ्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये हा संघ अंतिम फेरीत खेळला होता. (IPL 2025, RCB in Final)
आता मुल्लनपूरच्याच मैदानावर शुक्रवारी एलिमिनेटरचा सामना होईल. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा हा सामना रंगेल. आणि पंजाब किंग्जलाही दुसरी संधी मिळेल. मुंबई आणि गुजरातमधील विजेता संघ दुसऱ्या पात्रता सामन्यात पंजाबशी लढत देईल. (IPL 2025, RCB in Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community