Tripura Floods : त्रिपुरात सततच्या पावसामुळे हाहाकार, तब्बल १,३०० कुटुंबांचं स्थलांतरण, मुख्यमंत्री म्हणाले…

Tripura Floods : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे त्रिपुरात अनेक कुटुंबाचे स्थलांतरण करण्यात आले आहे. राज्यातील सुमारे १,३०० कुटुंबांनी सरकारच्या कॅम्पमध्ये आश्रय घेतला आहे. पावसामुळे पश्चिम त्रिपुरा(Tripura Floods) जिल्ह्यातील अनेक कुटुंबाला पुराचा फटका बसला आहे.

50

Tripura Floods : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे त्रिपुरात अनेक कुटुंबाचे स्थलांतरण करण्यात आले आहे. राज्यातील सुमारे १,३०० कुटुंबांनी सरकारच्या कॅम्पमध्ये आश्रय घेतला आहे. पावसामुळे पश्चिम त्रिपुरा(Tripura Floods) जिल्ह्यातील अनेक कुटुंबाला पुराचा फटका बसला आहे. परिणामी, बाधित कुटुंबांना सुरक्षिततेसाठी सरकारी निवारा गृहांमध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने १ जून ते ५ जून २०२५ दरम्यान त्रिपुरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा जारी केला आहे.(Tripura Floods)

(हेही वाचा ‘ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यानंतर शेकडो भाजप कार्यकर्त्यांची हत्या’; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचा घणाघात )

दरम्यान, त्रिपुरा सरकार पूरग्रस्त भागांवर बारकाईने लक्ष ठेवून असून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), नागरी स्वयंसेवक आणि इतर एजन्सींच्या पथकांना बचाव आणि मदत कार्यात मदत करण्यासाठी तैनात केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.(Tripura Floods)

All Party Delegation : ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या शिष्टमंडळाच्या दौऱ्याबाबत शशी थरुर यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले….

पूरग्रस्त(Tripura Floods) भागातील रहिवाशांना सरकारी सूचनांचे पालन करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन अधिकारी करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, आगरतळामधील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पाणी बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाण्याचे पंप सुरू केले. त्याचपबरोबर, आयएमडीने रहिवाशांना पाणी साचण्याची आणि भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या भागात टाळणे, अनावश्यक प्रवास करणे टाळणे आणि वाहतूक आणि हवामान सूचनांचे पालन करणे यासह खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.


ईशान्य भारताला पावसाने अक्षरशः झोडपले

आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा यांसारख्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दोन दिवसांत २६ हून अधिक मृत्यूंची नोंद झाली. आसाममध्ये भूस्खलन आणि पुरामुळे १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यातील बाणा-सेप्पा रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग १३ वर भूस्खलनामुळे एक कार खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत २ जणांना आपला जीव गमवावा लागला.(Tripura Floods)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.