Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ एअर इंडियाच्या प्रवासी विमाना(Ahmedabad Plane Crash)ला भीषण अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत प्रवासी विमान कोसळल्याची भीषण दु्र्घटना घडल्याची माहिती समोर आली. दरम्यान, गुजरातच्या मेघानीनगर परिसरात विमान कोसळले असून यातील सर्व प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.(Ahmedabad Plane Crash)
(हेही वाचा Ahmedabad Plane Crash : मृत्युमुखी पडलेल्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली )
दरम्यान, एअर इंडियाची मालकी असलेल्या टाटा समूहाकडून पोस्ट करण्यात आली आहे. टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी पोस्ट केली असून मृतांच्या प्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. पोस्टमध्ये म्हटले की, अहमदाबाद लंडन गॅटविक येथे जाणाऱ्या एअर इंडियाचे फ्लाईट १७१ चा दुर्देवी अपघात(Ahmedabad Plane Crash) झाला आहे, याची अत्यंत दुःखाने पुष्टी करतो. या विनाशकारी घटनेत मृत झालेल्या सर्वांच्या कुटुंबीय आणि प्रियजनांबाबत तीव्र संवेदना आहेत.
पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, सध्या आमचे प्राथमिक लक्ष सर्व बाधित लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करणे आहे. आम्ही घटनास्थळी असलेल्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना मदत करण्यासाठी आणि बाधितांना आवश्यक ती मदत व काळजीबाबत आमच्या परीने सर्वकाही करत आहोत. तसेच, अधिक माहिती मिळताच पुढील अपडेट्स शेअर केले जातील. माहिती मागणाऱ्या कुटुंबांसाठी एक आपत्कालीन केंद्र सक्रिय करण्यात आले असून मदत पथकदेखील स्थापन करण्यात आले आहे, असे एअर इंडियाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले.(Ahmedabad Plane Crash)
Join Our WhatsApp Community