भारतीय रेल्वे (Tatkal tickets ) ही देशातील सर्वात मोठी वाहतूक व्यवस्था आहे. अनेक दशकांपासून रेल्वेने देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना जोडण्याचे काम केले आहे. या व्यापक नेटवर्कमुळे लाखो लोकांना दररोज प्रवास करण्याची सुविधा मिळते. भारतीय रेल्वेने आता तत्काळ तिकीटांच्या बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Tatkal tickets )
Bharatiya Railways will soon start using e-Aadhaar authentication to book Tatkal tickets.
This will help genuine users get confirmed tickets during need.
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 4, 2025
या पुढे तत्काळ तिकीट (Tatkal tickets ) काढताना या अटी आणि नियम पूर्ण करणाऱ्यांनाच तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे. तत्काळ तिकीटांचा योग्य वापर व्हावा या उद्देश्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने रेल्वेच्या तत्काळ तिकीटांचा ऊठसुठ वापर रोखला जाणार आहे. तत्काळ तिकीटांची (Tatkal tickets ) ऑनलाईन बुकींग आता त्याच व्यक्तींना करता येणार आहे. ज्यांच्या आधारकार्डचे ई- ऑथेंटीकेशन पूर्ण झालेले आहे. या बाबत रेल्वे मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Tatkal tickets )
हेही वाचा- Surajya Abhiyan : शैक्षणिक लूटमारीला लगाम; जळगावच्या आदेशानंतर राज्यभरात अंमलबजावणीची मागणी
ज्यांचे आधारकार्डचे ऑनलाईन पडताळणी झाली आहेत. त्यांनाच आता तत्काळ तिकीटांच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे. आयत्यावेळी जादा पैसे मोजून प्रवास करता यावा यासाठी तत्काळ तिकीटांची (Tatkal tickets ) योजना आणण्यात आली. परंतू या सुविधेचा गैर वापर करणारे असल्याने खऱ्या लोकांना तिकीट मिळत नाही. त्यामुळे आता आधारकार्डचे ई-व्हेरीफिकेशन असेल त्यांना ऑनलाईन तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे. (Tatkal tickets )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community