पुणे-कोल्हापूर या दरम्यान धावणारी वंदे भारत (Vande Bharat) आता मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, येत्या १५ दिवसांत ती टर्मिनसवरून धावण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. (Vande Bharat)
हेही वाचा-CIDCO Lottery 2025 : नवी मुंबईत घर घ्यायचा विचार करताय ? तर ही बातमी तुमच्यासाठी …
सध्या कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत ट्रेन सोमवार, गुरुवार आणि शनिवार अशी ३ दिवस धावते. हीच ट्रेन पुण्यापर्यंत धावत असल्याने व्यापारी, प्रवासी, नोकरदार वर्गाची ती मुंबईपर्यंत सोडण्यात यावी, अशी मागणी होत होती. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे सोडण्यात यावी, अशी पुन्हा मागणी केली. (Vande Bharat)
खासदार धनंजय महाडिक यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचा परिणाम म्हणून ही रेल्वे मंजूर झाली आहे. लवकरच गाडीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसांत मुंबई-कोल्हापूर यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. (Vande Bharat)
हेही वाचा- Bengaluru Stampede : तुम्ही आख्ख्या जगाला बोलावलं; कर्नाटक सरकारने फोडले आरसीबीवर खापर
वंदे भारत ट्रेन ही भारतीय रेल्वेने विकसित केलेली खास आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ट्रेन आहे. या ट्रेनचा कमाल वेग 160 किमी/तास आहे. या ट्रेनच्या सर्व कोचमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत. तसेच ट्रेनचे सर्व कोच पूर्णतः वातानुकूलित आहेत. प्रवासादरम्यान स्थानकांचे अपडेट LCD स्क्रीनवर दिले जातात. तसेच यात आधुनिक व्हॅक्युम बायो-टॉयलेट्स आहेत. या ट्रेनला पारंपरिक ट्रेनच्या तुलनेत 30% कमी वेळ लागतो. (Vande Bharat)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community