
मान्सून सुरू होण्यापूर्वीच कोकण रेल्वेने (Konkan Railway) मुसळधार पावसात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेकडून (Konkan Railway) विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. पावसामुळे कोकण रेल्वेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेकडून (Konkan Railway) कामांचे नियोजन करण्यात आले आहे. मुसळधार पावसात लोको पायलटने सुरक्षित वेगाने गाडी चालवावी, अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. (Konkan Railway)
संवेदनशील ठिकाणी ३६५ कर्मचारी तैनात
कोकण रेल्वे (Konkan Railway) कॉर्पोरेशनने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली असून, पावसाळ्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. सुरक्षित प्रवास, नियंत्रण आणि उत्तम दर्जाची प्रवासी सुविधा या तिन्ही आघाड्यांवर कोकण रेल्वे (Konkan Railway) सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात रेल्वे वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, यादृष्टीने बेलापूर, रत्नागिरी, मडगाव येथे नियंत्रण कक्षासह संवेदनशील ठिकाणी ३६५ कर्मचारी तैनात केले असल्याचे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. (Konkan Railway)
एका दिवसात १०० मिमीहून अधिक पाऊस झाल्यास …
दरवर्षी कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर पावसामुळे दरड कोसळणे, रुळांवर पाणी साचणे, पूलांवर ताण येणे, तसेच वाऱ्याचा वेग अचानक वाढणे या समस्या उभ्या राहतात. यंदाही या सर्व बाबींचा विचार करून रेल्वे प्रशासनाने संपूर्ण पावसाळा काळ लक्षात घेता सुरक्षेची सर्वंकष योजना आखली आहे. यंदाच्या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी १५ जून ते २० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. या काळात हवामान खात्याशी रोजचा समन्वय साधला जाणार असून, एका दिवसात १०० मिमीहून अधिक पाऊस झाल्यास रेल्वेसेवा तात्पुरती थांबवण्यात येईल आणि हवामान सुधारल्यानंतरच ती पुन्हा सुरू केली जाईल. ही कार्यवाही प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Konkan Railway)
यंत्रसामग्री सज्ज
रेल्वे मार्गावरील अतिसंवेदनशील भागांवर ३६५ प्रशिक्षित कर्मचारी दिवस-रात्र कामावर तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, रत्नागिरी, चिपळूण, कणकवली आणि वेरणा येथे आपत्कालीन स्थितीत तत्काळ हस्तक्षेप करता यावा यासाठी खोदकामासाठी लागणारी यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये बिघाड झाल्यास माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडपी येथे टॉवर वॅगन्स सतत तयार ठेवण्यात आले आहेत. (Konkan Railway)
कोकण रेल्वेमार्गावरील चार महत्त्वाचे पूल
पनव्हल व्हायाडक्ट, मांडवी, झुआरी आणि शरावती हे जोरदार पावसात आणि वाऱ्यात अत्यंत संवेदनशील मानले जातात. याठिकाणी यंदा वाऱ्याचा वेग अचूकपणे मोजण्यासाठी अॅनिमोमीटर्स बसवण्यात आले आहेत. वाऱ्याचा वेग धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यास रेल्वे प्रशासन तात्काळ सेवा थांबवण्याचा निर्णय घेऊ शकणार असून त्यामुळे अपघात रोखण्यास मदत होईल. कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. (Konkan Railway)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community