एअर इंडियाचे (Air India ) दिल्ली ते बाली हे विमान AI2145 अर्ध्या मार्गातूनच दिल्लीला परतले आहे. बाली विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या वृत्तामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. ज्या विमानतळावर विमान उतरणार होते, त्या विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. (Air India )
एअर इंडियाने (Air India ) त्यांच्या निवेदनात म्हटले की, ‘आज(१८ जून २०२५) रोजी बाली विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे दिल्लीहून बालीला जाणारे विमान AI2145 दिल्लीला परतले. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले असून, सर्व प्रवासीदेखील सुरक्षित आहेत.’ (Air India )
हेही वाचा- “मुंबई तुमची आहे, तिच्याविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या अन्यथा…” ; Supreme Court ने ओढले ताशेरे
एअरलाइनने निवेदनात प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे आणि म्हटले की, ‘विमान माघारी परतल्यामुळे प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. गैरसोय कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.’ याशिवाय, कंपनीने प्रवाशांना तिकीट रद्द केल्यास किंवा त्यांच्या पसंतीनुसार वेळापत्रक बदलल्यास पूर्ण परतफेडीची ऑफरदेखील दिली आहे. (Air India )
हेही वाचा- १२० किलो वजनाचे हवेतून 100 किमी मारा करणारे ‘स्मार्ट वेपन’ Indian Air Force ची ताकद वाढवणार
यापूर्वी मंगळवारी एअर इंडियाचे ७ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामध्ये अहमदाबाद-लंडन, दिल्ली-पॅरिस, दिल्ली-व्हिएन्ना, लंडन-अमृतसर, दिल्ली-दुबई, बेंगळुरू-लंडन आणि सॅन फ्रान्सिस्को-मुंबई या विमानांचा समावेश होता. (Air India )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community