-
ऋजुता लुकतुके
आयसीसी कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना अखेर ११ जूनपासून सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या या सामन्यात पहिल्या दिवशी पूर्ण ९० षटकांचा खेळ झाला. यात गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत १४ बळी मिळवले. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावांत २१२ धावांवर सर्वबाद झाल्यावर त्यांनीही आफ्रिकेचे ४ फलंदाज ४३ धावांत बाद केले आहेत. सध्यातरी लंडनमध्ये हवामानाचा अंदाज सामन्यासाठी अनुकूल असाच आहे. पण, जर सामन्यात पावसासह आणखी कुठल्या गोष्टीने व्यत्यय आणला किंवा सामना अनिर्णित राहिला तर अजिंक्यपद कुणाला बहाल केलं जाईल ते नियमानुसार समजून घेऊया. (WTC Final)
(हेही वाचा – Mumbai Drug Cartel: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ५२ कोटींच्या कोकेन प्रकरणात ७ ब्रिटीश नागरिकांना अटक)
हा सामना अनिर्णित राहिला म्हणजे पाच दिवसांचा निर्धारित खेळ संपल्यावरही निकाल कुणा एका संघाच्या बाजूने लागला नाही तर कसोटी अजिंक्यपदाची गदा दोन्ही संघांना विभागून देण्यात येईल. द्विपक्षीय मालिकेत बरोबरीची शक्यता असते. पण, इथं अजिंक्यपदाची गदा पणाला लागलेली असल्यामुळे दोन्ही संघांना विजयी घोषित करण्यात येईल. २०२१ मध्ये ही स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून हाच नियम अस्तित्वात आहे. पण, आतापर्यंत एकदाही चषक विभागून देण्याची वेळ आलेली नाही. आतापर्यंत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ विजयी झाले आहेत. दोन्ही वेळा उपविजेता संघ भारत होता. सामना अनिर्णित राहिला तर कुठल्याही प्रकारच्या टायब्रेकरची किंवा पहिल्या डावातील आघाडीवर विजेता ठरवण्याची सोय इथं नाही. (WTC Final)
(हेही वाचा – Bihar : वाहन तपासणी करणाऱ्या पोलिसांना स्कॉर्पिओने उडवले; महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू)
आयसीसीने या स्पर्धेसाठी राखीव दिवसाची सोय मात्र केली आहे. १६ जूनचा दिवस हा गरज पडल्यास राखीव दिवस म्हणून वापरता येईल. दिवसभरात रोज ९० षटकं अपेक्षित आहेत. आणि ती त्या त्या दिवशी संपवावी असा दंडक आहे. त्यासाठी रोज काही तास खेळ लांबवता येण्याची सोय आहे. पण, पाऊस किंवा अनियंत्रित कारणांमुळे षटकं फुकट गेली तर ती राखीव दिवसांतही भरून काढता येईल. राखीव दिवसांत जास्तीत जास्त ९० षटकं टाकता येतील आणि गरजेप्रमाणे पंचांच्या संमतीने हा वेळ वापरता जाईल. (WTC Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community