Shreyas Iyer ला कसोटी संघात स्थान का नाही, गंभीर स्पष्टच बोलला

इंग्लंड दौऱ्यात श्रेयस अय्यरला संघातून वगळलं आहे.

76

ऋजुता लुकतुके

रोहीत शर्मा आणि विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर भारतीय संघ स्थित्यंतराच्या काळातून जाणार आहे. आणि अशा संघाची पहिली परीक्षा जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंडच्या दौऱ्यात होणार आहे. या शुभमन गिल या नवीन संघाचा नेता असेल तर रिषभ पंतकडे उपकप्तानी सोपवण्यात आली आहे. करुण नायरलाही संघात स्थान मिळालं आहे. पण, अनुभवी श्रेयस अय्यरला मात्र वगळण्यात आलं आहे. सध्या आयपीएलमध्ये (IPL) पंजाब किंग्जकडून श्रेयस चांगली कामगिरी करतोय. त्याचं नेतृत्वही चर्चेत आहे. तर स्थानिक क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. (Shreyas Iyer)

(हेही वाचा – Elon Musk यांचा कार्यकाळ संपला, Donald Trump यांची सोडली साथ)

अशावेळी श्रेयस अय्यरला का वगळलं हा प्रश्न संघाची निवड जाहीर झाल्यावर विचारण्यात येत होता. या प्रश्नाचं एक उत्तर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी एकदा दिलं आहे. ‘श्रेयसने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो चमकला. पण, सध्या कसोटी संघात जागा रिकामी नाही,’ असं आगरकर यांचं म्हणणं होतं. आता पहिल्यांदाच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेही (Coach Gautam Gambhir) यावर भाष्य केलं आहे.

‘मी संघाची निवड करत नाही. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा,’ असं एका वाक्यातील उत्तर गंभीरने पत्रकारांना दिलं. श्रेयस अय्यर सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज फ्रँचाईजीचं यशस्वी नेतृत्व करत आहे. त्याचे नेतृत्व गुण सध्या चर्चेत आहेत. गुरुवारी पंजाब किंग्जचा मुकाबला पहिल्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे.

(हेही वाचा – Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीत व्हीआयपी गाड्यांना नो एंट्री, टोलमध्ये सवलत मिळणार !)

२०१४ नंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये पंजाबचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे. आणि त्याचं श्रेय खेळाडू आणि कप्तान म्हणूनही श्रेयस अय्यरला दिलं जात आहे. भारतीय कसोटी संघातून वगळल्यानंतर श्रेयसने जाणीवपूर्वक त्यावर टिपण्णी करणं टाळलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.