Bengaluru Stampede नंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया काय ?

Bengaluru Stampede नंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया काय ?

68
Bengaluru Stampede नंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया काय ?
Bengaluru Stampede नंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया काय ?

तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल स्पर्धा पहिल्यांदाच जिंकणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या (Bengaluru Stampede) संघाचा आनंद अल्पजीवी ठरला. आरसीबी संघाचा अचानक ठरवण्यात आलेला विजयोत्सव पाहण्यासाठी बुधवारी (दि.३ जून) हजारो चाहत्यांनी बंगळूरच्या (Bengaluru Stampede) एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एकाच वेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेसंदर्भात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Bengaluru Stampede)

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

बंगळूरच्या (Bengaluru Stampede) एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्‍या चेंगराचेंगरीच्‍या दुर्घटनेवर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर आरसीबी टीमच्या अधिकृत निवेदनासह स्वतःचा एक भावनिक संदेशही शेअर केला.”शब्दच सापडत नाहीत… अंत:करणातून व्यथित आहे.” असे त्‍याने म्‍हटले आहे. (Bengaluru Stampede)

हेही वाचा-Nashik Accident : चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव कार थेट बंगल्यात शिरली ; 5 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

तर आरसीबीने निवेदन जारी केले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, चेंगराचेंगरीच्‍या दुर्घटनेची माहिती मिळताच आमचा कार्यक्रम तात्काळ थांबवण्यात आला. स्थानिक प्रशासनाच्या आम्‍हाला दिलेल्‍या सूचनांनुसार आम्ही पुढील निर्णय घेतला. या दुःखद घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आम्‍हाला तीव्र दु:ख झाले आहे. आमच्‍या संवेदना पीडित कुटुंबांप्रती आहेत. (Bengaluru Stampede)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.