-
ऋजुता लुकतुके
विराट कोहलीने (Virat Kohli) रवी शास्त्री आणि संजय बांगर या दोन व्यक्तींबरोबर आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर चर्चा केली होती. त्यानंतर आता रवी शास्त्री यांनीही या निर्णयावर आपलं भावूक मत नोंदवलं आहे. विराट भारतीय संघाचा कर्णधार असताना रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक होते. दोघांनी परदेशात भारतीय संघाने कसोटी जिंकावी यासाठी प्रयत्न केले. सलग दोन वर्षं आयसीसी क्रमवारीत भारतीय संघ याच काळात अव्वल राहिला. त्यानंतर आता विराटच्या निवृत्तीवर बोलताना शास्त्री काहीसे संवेदनशील झालेले दिसले. ‘विराटच्या निवृत्तीचं प्रकरण बीसीसीआयने अधिक चांगलं हाताळायला हवं होतं,’ असं शास्त्री यांना वाटतं.
(हेही वाचा – Muhammad Yunus याचा भारताशी चकमकी घडवण्याचा प्रयत्न त्यांच्याच आर्मी जनरल ने हाणून पाडला)
‘विराटने (Virat Kohli) कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. पण, हे खूपच दुर्दैवी आहे. खेळाडू संघात नसेल तर त्याची किंमत जास्त समजते. विराटच्या बाबतीत तेच झालं आहे. तो खूप मोठा खेळाडू आहे. खूपच मोठा. अनेकदा आकडेवारी सगळं सत्य सांगत नाही. खासकरून विराट हा कसोटी क्रिकेटचा प्रवक्ता आहे. इंग्लंड दौऱ्यात लॉर्ड्सवर त्याने जे केलं ते अवर्णनीय होतं,’ असं शास्त्री यांनी एका टीव्ही कार्यक्रमात बोलून दाखवलं.
(हेही वाचा – देशात Corona बाधित रूग्णांचा आकडा 7154 वर ; 77 जणांचा मृत्यू)
Ravi Shastri weighs in on Virat Kohli’s Test retirement 🏏
Watch ‘Bharat Tum Chale Chalo, Kahani 21-22 ki’ from 15th June, only on Sony Sports Network TV channels & Sony Liv.#SonySportsNetwork #SonyLiv #BTCC #BharatTumChaleChalo #SonySportsOriginals #ENGvIND #TeamIndia pic.twitter.com/Pr9SWZrRM7
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) June 11, 2025
२०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहली (Virat Kohli) आपला पहिला कसोटी सामना खेळला. त्यानंतर १४ वर्षं तो अव्याहत कसोटी क्रिकेटची सेवा करत आला आहे. १२३ कसोटींत त्याने ४६.८५ च्या सरासरीने ९,२३० धावा केल्या आहेत. यात ३० शतकं आणि ३१ अर्घशतकं आहेत. भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा तो चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. शास्त्री यांनी विराटच्या अचानक निवृत्तीच्या निर्णयावर खूप मोठं भाष्य केलं आहे. ‘तो ज्या पद्धतीने अचानक कसोटीतून निवृत्त झाला आहे ते वेदनादायी आहे. माझा या घडामोडींशी थोडा जरी संबंध असता, तर मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याला कर्णधार केलं असतं,’ असं रवी शास्त्री विराटवर बोलताना म्हणाले. विराट भारताचा सगळ्यात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. ६८ सामन्यांत त्याने भारतीय संघाचं नेतृत्व केलं. यात भारताने ४८ कसोटी जिंकल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community