-
ऋजुता लुकतुके
टी दिलीप यांची भारतीय राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षक पदी फेरनियुक्ती झाली आहे. ते भारताचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक होते. पण, गेल्याच महिन्यांत त्यांची पदावरून हकालपट्टी झाली होती. पण, आता क्रिकबझ या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, दिलीप यांनाच एका वर्षासाठी परत बोलावण्यात आलं आहे. एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माच्या बोलावण्यावरून ही फेरनियुक्ती झाल्याचं समजतंय. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या खराब कामगिरीनंतर प्रशिक्षकांच्या ताफ्यात बदल करण्यात आले होते. दिलीप यांची हकालपट्टी झाली आणि त्यांच्याजागी सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन ड्युसकाटे हे क्षेत्ररक्षणाकडेही लक्ष देत होते. पण, आता रोहित शर्माच्या विनंतीवरून बीसीसीआयने दिलीप यांना परत बोलावले आहे. रोहित शर्माने कायमच दिलीप यांना पदावरून हटवण्याला विरोध केला होता. (T Dilip Back as Fielding Coach)
(हेही वाचा – अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नव्हे, ती मानवतेची चळवळ आहे; आरोग्यमंत्री Prakash Abitkar यांचे विधान)
२०२१ मध्ये टी दिलीप यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी आर श्रीधर यांची जागा घेतली. भारतीय खेळाडूंमध्ये ते लोकप्रिय होते. भारतीय संघाच्या सुधारलेल्या क्षेत्ररक्षणाचं श्रेय त्यांना दिलं जात होतं. २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर त्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर त्यांचा करार मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आला होता. पण, मध्येच त्यांना काढून टाकण्यात आलं. ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर दिलीप आणि अभिषेक नायर यांच्यावर बीसीसीआयची कुऱ्हाड कोसळली. (T Dilip Back as Fielding Coach)
(हेही वाचा – Indo – Pak Tension : पाकिस्तानने आता स्पोर्ट्समध्येही खिलाडूवृत्ती सोडली; पाक टेनिसपटूचा पराभवानंतर मैदानातच तमाशा)
पण बीसीसीआयला दिलीप यांच्या जागी अजूनही चांगला पर्याय मिळालेला नाही. त्यामुळे अखेर रोहितच्या सांगण्यावरून त्यांना पुन्हा ही जबाबदारी देण्यात आली आहे. दिलीप यांनी २००७ ते २०१९ पर्यंत हैदराबाद क्रिकेट असोसिएशनसोबत कोचिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्येही खेळाडूंबरोबर काम केलं आहे. भारतीय संघ ६ जून रोजी इंग्लंडला रवाना होईल दरम्यान, भारत अ संघ कसोटी संघातील काही सदस्यांसह इंग्लंडला पोहोचला आहे. आकाश दीप वगळता सर्व खेळाडू केंटमधील टीम हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. भारतीय वरिष्ठ कसोटी संघ ६ जून रोजी मुंबईहून रवाना होईल. २० जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात भारताला ५ कसोटी सामने खेळायचे आहेत. (T Dilip Back as Fielding Coach)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community