-
ऋजुता लुकतुके
लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) अखेर सगळ्यांना फॉर्म तात्पुरता असतो आणि दर्जा कायमचा हे दाखवून दिलं. या हंगामातील आपल्या शेवटच्या आयपीएल (IPL 2025) सामन्यात अखेर पंतने आपलं ट्रेडमार्क शतक ठोकलं. फक्त ऋषभ पंतलाच (Rishabh Pant) जमतील असे ८ षटकार त्यात होते. आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ऋषभने शेवटपर्यंत मैदानावर टिकून संघालाही प्रथमच दोनशेच्या पार नेलं. हा सामना अखेर रॉयल चॅलेंजर्सनी जिंकला असला तरी ऋषभ पंतची ही खेळी नक्कीच विसरण्यासारखी नव्हती. पण, एरवी कर्णधार म्हणून त्याच्यावर करडी नजर ठेवून असलेले संधमालक संजीव गोयंका (Sanjiv Goenka) ही खेळी पाहण्यासाठी मैदानावर हजर नव्हते.
ऋषभ पंतने (Rishabh Pant) ६६ चेंडूंत नाबाद ११८ धावांची खेळी केली. यात ८ षटकारांसह ११ चौकार होते. ५५ चेंडूंत त्याने शतक पूर्ण केलं ते ही एकहाती फटका खेळूनच…
(हेही वाचा – Income Tax Return : आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत यंदा १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली; जूनमध्ये उघडणार नवीन पोर्टल)
When he hits, they stay as hit 😍
A 𝗣𝗮𝗻𝘁𝗮𝘀𝘁𝗶𝗰 𝘄𝗮𝘆 𝘁𝗼 𝗴𝗲𝘁 𝘁𝗼 𝗮 💯
Updates ▶ https://t.co/h5KnqyuYZE #TATAIPL | #LSGvRCB | @RishabhPant17 pic.twitter.com/Hka9HBgpFy
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
आतापर्यंत या हंगामात ऋषभ पंत (Rishabh Pant) सातत्याने अपयशी ठरत होता. आणि १३ सामन्यांत त्याने जेमतेम १५३ धावा केल्या होत्या. पण, ही कसर काही प्रमाणात त्याने भरून काढली. आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी आपण फॉर्ममध्ये परतल्याचं त्याने ठणकावून सांगितलं. पंतकडून फक्त धावाच होत नव्हत्या असं नाही तर मैदानावर टिकून राहणंही न जमल्यामुळे त्याचा स्ट्राईक रेटही १०७ धावांवर घसरला होता. पण, शेवटच्या सामन्यात मात्र त्याने १०० चेंडूंवर १९३ धावांच्या वेगाने फलंदाजी केली.
ऋषभच्या चेहऱ्यावर शतक पूर्ण झाल्याचा आनंद जाणवत होता. एरवी मैदानावर कधीही इतका जल्लोष साजरा न करणारा ऋषभ पंत (Rishabh Pant) यावेळी मात्र मूठ आवळून आनंद साजरा करत होता. त्याने चक्क एक सॉमरसॉल्ट उडी घेत लोकांचंही मनोरंजन केलं.
(हेही वाचा – Veer Savarkar : हे सिंधुसरिते ! हे मुक्तसरिते !! स्वातंत्र्यवीर सावरकरांची अशीही एक प्रतिज्ञा)
THE GREATEST WK BATTER OF ALL TIME PANT🔥💗❣️
You have our respect Pant 🫡 pic.twitter.com/bmGCDlVy2M
— arnav. (@TheDrArnav) May 27, 2025
आयपीएल (IPL 2025) नंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी (Test series) जाणार आहे. आणि या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी ऋषभला सूर गवसला ही भारतासाठी जमेची बाजू आहे. पंतने सुरुवात थोडी धिमी करताना आपलं अर्धशतक २९ चेंडूंत पूर्ण केलं. पण, त्यानंतर त्याने असा वेग पकडला की, पुढच्या ५० धावा त्याने फक्त १६ चेंडूंत केल्या. लखनौ सुपरजायंट्स संघाचं आव्हान साखळीतच आटोपलंअसलं तरी पंतला इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी वेळ मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community