२०२५ च्या आयपीएल हंगामात बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सने (RCB) तब्बल १८ वर्षांनी या स्पर्धेची चमचमती ट्रॉफी उंचावली. मात्र, या जेतेपदानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणूकीत चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर जवळपास ३० हून अधिक जखमी झाल्याची बाब समोर आली. या चेंगराचेंगरीचा तपास पोलिसांकडून सध्या सुरु आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडी एकीककडे घडत असताना दुसरीकडे आरसीबीच्या संघासमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. (RCB)
आरसीबीच्या (RCB) संघावर आयपीएलच्या २०२६ मधील हंगामात बंदीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयपीएलमधील प्रत्येक फ्रँचायझीचा बीसीसीआयशी एक करार झालेला असतो. त्यामध्ये सार्वजनिक सुरक्षेबाबत एक महत्वाचे कलम आहे. आता चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या चौकशी समितीने जर आरसीबीला दोषी ठरवले तर त्यांच्यावर बंदीची कारवाई केली जाऊ शकते. (RCB)
हेही वाचा- जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या MIDC मध्ये 500 एकर भूखंड राखीव : Uday Samant
“आम्ही शांतपणे बसून बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. ही विजयी मिरवणूक आरसीबीकडून काढण्यात येणार होती. पण भारतात जर क्रिकेटमध्ये काही घडलं तर त्यासाठी बीसीसीआयला जबाबदार ठरवण्यात येतं. त्यामुळे भविष्यात अशी घटना घडणार नाही अशी अपेक्षा आम्ही करतो, ” असं बसीसीआयचे सचिव देवजित सौकीया यांनी म्हटलं आहे. त्यामुळे २०२६ च्या आयपीएल हंगमात आरसीबीच्या संघाला सहभागी करुन घ्यायचे की नाही याबाबत बीसीसीआय काही ठोस पावलं उचलण्याच्या विचारात आहे. त्याचप्रमाणे अशा घटना रोखण्यासाठी बीसीसीआय नवीन कायदा आणण्याबाबतही विचाराधीन आहे. (RCB)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community