-
ऋजुता लुकतुके
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा भारतीय संघातील जिगरबाज अष्टपैलू खेळाडू आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर खमका फिरकीपटू म्हणून आणि परदेशी खेळपट्टीवर निव्वळ फलंदाज म्हणूनही जडेजा उपयुक्त खेळाडू आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतर संघातील सगळ्यात वरिष्ठ खेळाडू जडेजाच आहे. अलीकडेच १,२०० दिवसांच्या वर आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल राहण्याचा विक्रम त्याने केला आहे.
रोहितच्या निवृत्तीनंतर संघातील ज्येष्ठ खेळाडू म्हणून जडेजाला (Ravindra Jadeja) कप्तानी करावी असं वाटलं नाही का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. जडेजानेही आपला जुना सहकारी रवीचंद्रन अश्विनशी युट्यूब चॅनलसाठी गप्पा मारताना यावर प्रांजळ आणि तितकंच रोखठोक मत दिलं आहे. ‘का नाही आवडणार?’ असं तो सुरुवातीलाच म्हणतो.
(हेही वाचा – Bullet Train Virar : बुलेट ट्रेनसाठी विरार स्थानकाच्या कामाला सुरूवात)
‘मला नक्कीच कप्तान व्हावं असं वाटतं. मागच्या अनेक वर्षांत मी वेगवेगळ्या कप्तानांच्या नेतृत्वाखाली खेळलो. प्रत्येकाची शैली वेगळी होती. त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. महेंद्रसिंग धोनीचं उदाहरण द्यायचं झालं तर तो फलंदाजांना असुरक्षित कसं वाटेल याचा विचार करायचा. ते जिथे चेंडू मारण्याचा प्रयत्न करतील, असं त्याला वाटायचं तिथेच तो नेमका क्षेत्ररक्षक ठेवायचा,’ असं जडेजा (Ravindra Jadeja) उत्तरादाखल म्हणाला.
सगळ्यांकडून काही ना काही शिकत गेल्याचं जडेजाला (Ravindra Jadeja) वाटतं. शिवाय टी-२० पेक्षा कसोटीतील कप्तानी काहीशी सोपी असल्याचंही त्याचं मत आहे. ‘कसोटीत तुम्हाला ३ किंवा ४ वेळा क्षेत्ररक्षक बदलावे लागतात. थोडं हिशोबी राहावं लागतं. पण, टी-२० मध्ये प्रत्येक चेंडूला आव्हान असतं. प्रत्येक चेंडू एक घटना असते,’ असं जडेजा म्हणाला.
(हेही वाचा – महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचा ‘नो रिस्क’ फॉर्म्युला; BJP स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम)
भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची इच्छा जडेजाने बोलून दाखवली खरी. पण, ही मुलाखत त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड जाहीर होण्यापूर्वी दिली आहे. अश्विन चालवत असलेल्या युट्यूबला दिलेली ही मुलाखत उशिराने प्रसारित झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावरील संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून जडेजाचा (Ravindra Jadeja) समावेश आहे.
नेतृत्वाबद्दल बोलायचं झालं तर जडेजाने काही काळ चेन्नई सुपरकिंग्ज या आयपीएल फ्रँचाईजीचं नेतृत्व याच हंगामात केलं आहे. ऋतुराज गायकवाड जायबंदी झाल्यावर दोन सामन्यांसाठी जडेजा (Ravindra Jadeja) कप्तान होता. पण, संघाचा एकूणच गाडा रुळावरून घसरल्यावर प्रशासनाने महेंद्रसिंग धोनीला पुन्हा नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community