-
ऋजुता लुकतुके
बुधवारी बंगळुरू विरुद्ध लखनौ हा सामना रंगला तो दोन्ही बाजूच्या फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे. त्यातही ४ बाद १२३ अशा अवस्थेत असलेल्या बंगळुरूला अडचणीतून बाहेर काढून विजयाच्या मार्गावर नेण्याचं काम हंगामी कर्णधार जितेश शर्माने केलं. त्याने ३३ चेंडूंत नाबाद ८५ धावा करताना ६ षटकार आणि ८ चौकारांची आतषबाजी केली. घणाघाती फलंदाजी करताना त्याने जोखीमही पत्करली. त्यामुळे दोनदा तो बाद होता होता राहिला. यातील दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर त्याचा रिव्हर्स स्विपचा फटका चुकला. चेंडू आयुष बदोनीकडे थेट गेला. झेल पकडताना चेंडू जमिनीला लागला का हा प्रश्नही होताच. पण, त्याही पूर्वी दिग्वेश राठीचा हा चेंडू तिसऱ्या पंचांनी नोबॉल दिला. बरोबर क्रीझवर पाय पडलेला असताना हा चेंडू नोबॉल का दिला त्याविषयीचा नियम समजून घेऊया. (IPL 2025, RCB in Top 2)
(हेही वाचा – माजी आमदार Rahul Jagtap यांचा अजित पवार गटात प्रवेश)
JITESH SHARMA GOT OUT.
– But it’s a No Ball, a backfoot No Ball. pic.twitter.com/FRLXpqG9oY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 27, 2025
१६.१ षटकांत हा प्रसंग घडला. बंगळुरूला तेव्हा विजयासाठी २३ चेंडूंत ३९ धावा हव्या होत्या आणि दिग्वेशचा चेंडू रिव्हर्स स्वीप करताना जितेशचा फटका चुकला. पॉइंटवर बदोनीने त्याचा झेल पकडला. हा चेंडू जमिनीला टेकण्याची शक्यता होती. त्यामुळे पंचांनी तंबूत परतणाऱ्या जितेश शर्माला थांबवलं आणि टीव्ही पंचांनी आपलं काम सुरू केलं. त्यांच्या टीव्ही रिप्लेमध्ये दिग्वेशने क्रीझमध्ये टाकलेला पहिला पाय हा मागच्या निळ्या रेषेवर असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे नियमाप्रमाणे हा बॅकफूट नोबॉल देण्यात आला. गोलंदाजाचा बॅकफूट निळ्या पॉपिंग लाईनवर होता. आणि त्यामुळे जितेशला जीवनदान मिळालं. आणि फ्री-हिटही. त्याच षटकांत आणखी एक नाट्यमय प्रसंग घडला. दिग्वेशने चेंडूची फेक पूर्ण न करता, तो मध्येच थांबला आणि जितेश क्रीझबाहेर आहे असं पाहून दिग्वेशने बेल्स उडवल्या. इथं लखनौचा कर्णधार रिषभ पंतने खिलाडू वृत्ती दाखवत दिग्वेशचं अपील मागे घेतलं. (IPL 2025, RCB in Top 2)
(हेही वाचा – IPL 2025 Final : आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआय करणार ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या सैनिकांचा सन्मान)
Rishabh pant : I will take back the appeal 🔥🔥
Such A great gesture by Rishabh pant 💥🙌🔥#RCBvsLSG #RishabhPant #Jiteshsharma #ViratKohli #digveshrathi pic.twitter.com/L82wbqtJ0A— UPSC (@upsc_India_) May 27, 2025
जितेशने क्रीझ सोडली होती हे खरं होतं. पण, दिग्वेशनेही आपली गोलंदाजीची ॲक्शन पूर्ण केली होती. गोलंदाजीच्या क्रीझवर पाय टेकवल्यानंतर तो थांबला आणि नंतर त्याने चेंडू यष्टीवर फेकला. क्रिकेटच्या नियमांनुसार, गोलंदाजीची ॲक्शन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला फलंदाजाला असं बाद करता येत नाही. त्यामुळे जितेश बाद नव्हताही आणि रिषभनेही कर्णधार म्हणून खिलाडू वृत्तीला प्राधान्य देत हे अपील रद्द केलं. त्याने जितेश शर्माला मिठी मारत समझौताही केला. (IPL 2025, RCB in Top 2)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community