ऋजुता लुकतुके
आयपीएलमध्ये बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाने मंगळवारी मिळवलेला विजय अजूनही लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. हंगामी कर्णधार जितेश शर्माने (Jitesh Sharma) ३३ चेंडूंत नाबाद ८५ धावा करत संघाला हा विजय मिळवून दिला. त्याचं आयपीएलमधील पहिलंच अर्धशतक अशाप्रकारे संघासाठी मोलाचं ठरलं. ४ बाद १२३ अशी संघाची अवस्था असताना तो फलंदाजीला उतरला. संघाचा मार्गदर्शक दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) दोन वाक्यांनी या कामगिरीसाठी प्रेरणा दिल्याचं जितेशने म्हटलं आहे. (IPL 2025 RCB in Top 2)
(हेही वाचा – मुंबईतील खाजगी जागांमधील झाडांचीही छाटणी BMC करणार मोफत )
जितेश मैदानात उतरला तेव्हा दुसऱ्या कुणाचा नाही तर विराटचा बळी गेला होता. पाठलागांचा बादशाह हे बिरुद कमावलेला विराटच बाद झाल्यामुळे बंगळुरूच्या तंबूत चिंतेचं वातावरण होतं. ‘खोलवर विचार कर. सखोल फलंदाजी कर,असं दिनेश अण्णा आम्हाला नेहमी सांगतात. विराट भाईचा खेळही तसाच आहे. आणि मी तेवढाच विचार केला,’ असं सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जितेश शर्मा म्हणाला.
(हेही वाचा – Central Railway वर रात्री ९ नंतर तिकीट खिडक्या बंद; नेमकं काय कारण ? )
सुरुवातीला थोडा गोंधळलेला होतो. पण, नंतर मयांकबरोबर जोडी जमली, असंही जितेश पत्रकारांशी बोलताना म्हणाला. ‘माझ्याकडून अशी खेळी साकारली आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही. मी फक्त दडपण माझ्यात मुरवून घेतलं आणि संघासाठी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. जितका जास्त वेळ फलंदाजी करता येईल, तितकी करायची, इतकंच सुरुवातीला ठरवलं होतं,’ असं पुढे जितेश म्हणाला.
प्रत्यक्षात त्याने नाबाद ८५ धावा केल्या त्या ३३ चेंडूंत. आणि ६ षटकार आणि ८ चौकारांची आतषबाजी करत त्याने बंगळुरूला सामना ८ चेंडू राखून जिंकून दिला. दुसऱ्या डावांत २२८ धावा करत बंगळुरू फ्रँचाईजीने आयपीएलमध्ये तिसऱ्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. रजत पाटिदार जायबंदी असल्यामुळे जितेश संघाचा हंगामी कर्णधारही आहे. त्यामुळे त्याच्यावरील जबाबदारी दुहेरी होती. पण, त्याने दोन्ही बाजू सांभाळल्या.
(हेही वाचा – India’s Tour of England : कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या सराव सामन्याला मुकणार)
आणि बंगळुरूला गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवून दिलं. ‘मला थोडं दडपण आणि मैदानातील कोरडं हवामान यामुळे शरीरात पेटके येत होते. पण, विराटभाई, कृणालभाई आणि मयांक अगरवाल संघात असल्यामुळे दिलासाही होता. या मोठ्या खेळाडूंसह आम्ही लीगमध्ये नक्की चांगली कामगिरी करू असा विश्वास वाटतो,’ असं जितेश शेवटी म्हणाला. गुरुवारी २९ मे ला बंगळुरूचा मुकाबला पहिल्या पात्रता फेरीत पंजाब किंग्जशी होणार आहे.Dinesh Karthik
हेही पहा –
Join Our WhatsApp Community