-
ऋजुता लुकतुके
जवळ जवळ अडीच महिने चाललेली आयपीएल स्पर्धा अखेर संपली आहे. यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या रुपाने लीगला नवीन विजेताही मिळाला आहे. यंदा अंतिम चार संघ साखळी स्पर्धेत थोडे लवकरच स्पष्ट झाले. पण, त्यानंतर या चार संघांची क्रमवारी ठरण्यासाठी मात्र शेवटचा साखळी सामना उजाडावा लागला. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे हंगामातील सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारे दोन संघ ठरले. त्यांच्यातच अंतिम फेरीचा सामनाही रंगला. पण, बाकीच्या संघातूनही साखळी स्पर्धेदरम्यान काही मॅचविनिंग खेळी पाहायला मिळाल्या. लीगचे ७८ सामने पार पडल्यानंतर आता जाणून घेऊया कामगिरीच्या जोरावर आयपीएलमधील सर्वोत्तम अकरा खेळाडूंचा संघ कसा दिसेल? (IPL 2025, RCB Champions)
(हेही वाचा – India Tour of England : पहिल्या कसोटी सामन्याकरिता इंग्लंडचा संघ जाहीर; कुणा-कुणाचा संघात समावेश?)
आयपीएल २०२५ सर्वोत्तम अकरा खेळाडूंचा संघ – साई सुदर्शन, विराट कोहली, जोस बटलर, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, नूर अहमद, प्रसिध कृष्णा, जसप्रीत बुमराह व जोश हेझलवूड
साई सुदर्शन – २३ वर्षांचा हा पठ्ठा खऱ्या अर्थाने लीगमध्ये सातत्यपूर्ण होता. अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत त्याने धावा करणं सोडलं नाही. तो बाद होईपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला जिंकण्याची खात्रीच वाटू नये अशी त्याची कामगिरी होती. त्याचा स्ट्राईक रेट १५६ धावांचा तगडा होता आणि १५ सामन्यांत त्याने ७५९ धावा केल्या.
विराट कोहली – विराट कोहलीने तेच केलं, जे तो इतकी वर्षं करत आहे. सलामीला येऊन २० षटकं नेटाने खेळण्याची त्याची तयारी प्रत्येक सामन्यात दिसली. हंगामात ६०० हून जास्त धावा करण्याची कामगिरी त्याने सलग तिसरा हंगाम करून दाखवली. यंदा चषकही उंचावला हे त्याच्यासाठी विशेष. १४० धावांच्या स्ट्राईकरेटसह त्याने ६५४ धावा केल्या आणि ८ अर्धशतकं झळकावली. पाठलागांचा बादशाह हा लौकिकही त्याने कायम राखला. (IPL 2025, RCB Champions)
(हेही वाचा – BMC : विद्युत कामे करणारी कंपनी पकडणार भटक्या जनावरांना; कुठे चालली आहे मुंबई महापालिका?)
जोस बटलर – बटलर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळला. पण, ही जागा त्याने आपली करून टाकली. काही सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राईकरेट १७० च्याही वर होता आणि एकूण १३ सामन्यांत त्याने ५३८ धावा केल्या.
सूर्यकुमार यादव – सूर्यकुमार यादव जगातील कुठल्याही टी-२० संघात चौथ्या क्रमांकाचा फलंदाज असेल असं त्याचं कौशल्य आहे. यंदा त्याचा फॉर्मही चांगला होता आणि सातत्यही. १६ सामन्यांत ७१७ धावा त्याने केल्या त्या १६७ च्या स्ट्राईक रेटने. अनेकदा मुंबईने शेवटच्या ४ षटकांत सामना फिरवला तो केवळ सूर्यकुमारमुळे.
श्रेयस अय्यर – श्रेयस अय्यरने फलंदाज म्हणून आणि कर्णधार म्हणूनही या संघात स्थान मिळवलं असतं. या जिगरबाज खेळाडूने युवा संघाचं नेतृत्व करताना त्यांना जिंकण्याची स्वप्न दाखवली. संघाला गरज असताना तो मैदानात खमकेपणाने उभा राहिला. १७ सामन्यांत १७७ च्या स्ट्राईक रेटने त्याने स्पर्धेत ६०४ धावा केल्या. (IPL 2025, RCB Champions)
(हेही वाचा – IPL 2025, RCB Champions : विराटच्या आईने असा केला बंगळुरू विजयाचा आनंद साजरा)
हार्दिक पांड्या – गेल्या हंगामातील ट्रोलिंग विसरुन यावेळी हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सची चांगली मोट बांधली. अष्टपैलू म्हणून कामगिरीची चोख केली. १५ सामन्यांत १६० च्या स्ट्राईक रेटने २२४ धावा आणि स्पर्धेत १४ बळीही त्याने मिळवले.
जितेश शर्मा – लखनौ विरुद्ध ३९ चेंडूंत नाबाद ८७ धावांची खेळी करेपर्यंत कदाचित जितेशचं नाव कुणी घेतलं नसतं. पण, तोपर्यंतची त्याची कामगिरी काही कमी नव्हती. फक्त ती उठून दिसायची होती. त्याने यष्टीमागे १९ बळी मिळवले होते. संघाला गरज असताना १९ चेंडूंत ४४, ३९ चेंडूंत ८५ आणि १० चेंडूंत २४ अशा खेळीही त्याने साकारल्या होत्या. शिवाय २ सामन्यांत त्याने संघाचं यशस्वी नेतृत्वही केलं. संघाला गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आणण्यातही त्याचा वाटा मोठा होता.
कृणाल पंड्या – कृणाल पंड्या आयपीएल अंतिम फेरीत दुसऱ्यांदा सामनावीर ठरला आहे आणि ही कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. हे अधोरेखित करण्याचं कारण, मोठ्या सामन्यात हमखास मोठी खेळी करण्याची त्याची हातोटी. अंतिम सामनाही त्यानेच बंगळुरूला जिंकून दिला आणि स्पर्धेत मोलाच्या १०७ धावा करताना त्याने १४ बळीही मिळवले. (IPL 2025, RCB Champions)
(हेही वाचा – Railway Accident : प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर; धावत्या ट्रेनमधून पडून एकाने गमावला हात)
नूर अहमद – चेन्नई सुपर किंग्जचा हा एकमेव खेळाडू या हंगामात लक्षात राहिला. षटकामागे फक्त ८ धावा आणि लीगमध्ये २४ बळी यामुळे संघातील मुख्य फिरकीपटूची जागा दुसरा कुणी घेऊच शकत नाही.
जसप्रीत बुमराह – बुमराह या क्षणी जगातील कुठल्याही संघात आणि कुठल्याही प्रकारात बसेल असा खेळाडू आहे. किंबहुना, सगळ्या संघांना तो हवा हवासा वाटणाराच आहे. यंदाही मुंबईला मोक्याच्या क्षणी बळी मिळवून देण्याचं काम त्याने वारंवार केलं. तो फक्त १२ सामने खेळू शकला. पण, दुखापतीनंतर लय सापडायलाही त्याने फारसा वेळ घेतला नाही.
प्रसिध कृष्णा – ३ वर्षांनंतर प्रसिध कृष्णा आयपीएल खेळत होता. त्यावर आपली छाप उमटवण्यात त्याने कसलीही कसूर केली नाही. २५ बळींसह त्याने पर्पल कॅपही नावावर केली.
जोश हेझलवूड – बंगळुरूसाठी हेझलवूडने सातत्यपूर्ण कामगिरी केली. पॉवरप्लेमध्ये धावा रोखण्याचं महत्त्वाचं काम त्याने केलं आणि बळीही मिळवले. १२ सामने तो खेळला. पण, यात त्याने २२ बळी मिळवले. (IPL 2025, RCB Champions)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community