IPL 2025, RCB Champions : कृणाल पंड्याची गोलंदाजी ठरली निर्णायक; १७ धावांत २ बळी

IPL 2025, RCB Champions : अंतिम सामन्यात कृणालच सामनावीर ठरला. 

38
IPL 2025, RCB Champions : कृणाल पंड्याची गोलंदाजी ठरली निर्णायक; १७ धावांत २ बळी
  • ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या तंबूत कृणाल पंड्याला जादूगार म्हटलं जातं. कारण, हातात चेंडू असो, बॅट असो किंवा तो क्षेत्ररक्षण करत असो, सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. ३४ वर्षीय पंड्याने आपली उपयुक्तता या हंगामातही वारंवर सिद्ध केली. अंतिम सामन्यात पंजाबला विजयासाठी १९१ धावा हव्या असताना आणि प्रभसिमरन तसंच प्रियांश आर्य चांगली सुरुवात करण्याच्या तयारीत असताना त्यांच्या वाटेत अडसर म्हणून उभा ठाकला तो कृणाल पंड्या. (IPL 2025, RCB Champions)

जोश इंग्लिस खेळपट्टीवर होता तोपर्यंत पंजाब किंग्जचे हौसले बुलंद होते. त्याने २३ चेंडूंत ३९ धावा करताना ४ षटकारही लगावले होते. पण, पंड्याने वेगात सातत्याने बदल करत फलंदाजांना चकवलं. इंग्लिसलाही त्याच जाळ्यात ओढलं. लिव्हिंगस्टोनने हा झेल टिपण्यात कसूर केली नाही. ३९ धावांत इंग्लिस बाद झाल्यावर पंजाबची अवस्था ४ बाद ९८ अशी झाली. श्रेयस पाठोपाठ इंग्लिस बाद झाल्यावर बंगळुरूला विजयाची आशा वाटू लागली ती इथेच. (IPL 2025, RCB Champions)

(हेही वाचा – IPL 2025, RCB Champions : १८ वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजेतेपद, बंगळुरूत रस्त्या रस्त्यावर जल्लोष)

त्यापूर्वी धोकादायक प्रभसिमरनलाही पंड्यानेच बाद केलं होतं. आपल्या ४ षटकांत फक्त १७ धावा देत त्याने दोन महत्त्वाचे बळी मिळवले. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या अंतिम फेरीत पंड्याच दोन्ही संघांमधील फरक ठरला. दोन्ही संघातील सर्व गोलंदाजांनी षटकामागे किमान ७ ते ९ धावांच्या गतीने धावा दिल्या असताना पंड्याने पंजाबच्या फलंदाजांना रोखण्याचं काम केलं. त्यालाच सामनावीराचा किताब मिळाला. (IPL 2025, RCB Champions)

या चार षटकांमध्ये कृणालच्या गोलंदाजीवर पंजाबच्या फलंदाजांना फक्त एक षटकार मारता आला. चौकार तर एकही नाही. इथेच त्याचा प्रभाव दिसून येतो. सामना संपल्यानंतर आपल्या गोलंदाजीचं गमक पंड्याने बोलून दाखवलं. ‘मी आमचे फलंदाज बाद होत होते, त्या प्रत्येकाला विचारत होतो की, खेळपट्टी कशी आहे? त्यातून मला लक्षात आलं की, धिमे चेंडू टाकले पाहिजेत. पण, ते ही दुधारी शस्र आहे. टी-२० सामन्यात धिम्या चेंडूवर प्रहारही होऊ शकतो. त्यामुळे वेग बदलत राहायचा असंच मी ठरवलं होतं आणि ते तंत्र यशस्वी ठरलं,’ असं पंड्या म्हणाला. पंड्याने यापूर्वी तीनदा मुंबई इंडियन्सकडूनही चषक जिंकला आहे. यंदा पहिल्यांदाच बंगळुरू फ्रँचाईजीकडून त्याने ही किमया केली आहे. (IPL 2025, RCB Champions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.