IPL 2025, RCB Champions : किंग कोहलीची आणखी एका आयपीएल विक्रमाला गवसणी

अठरा वर्षांनंतर विराटचं आयपीएल विजयाचं स्वप्न पूर्ण झालं.

81
IPL 2025, RCB Champions : किंग कोहलीची आणखी एका आयपीएल विक्रमाला गवसणी
IPL 2025, RCB Champions : किंग कोहलीची आणखी एका आयपीएल विक्रमाला गवसणी
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहली (Virat Kohli) अलीकडे मैदानावर उतरतो, तेव्हा जुना एखादा विक्रम मोडतो आणि नवीन घडतो, हे नित्याचंच झालं आहे. तसंच आयपीएलच्या अंतिम फेरीत विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आणखी एक विक्रम जमा झाला. स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक चौकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. या बाबतीत आता त्याने शिखर धवनला (Shikhar Dhawan) मागे टाकलं आहे. अंतिम सामना सुरू झाला तेव्हा दोघांचेही ७६८ चौकार होते.

पण, डावाच्या चौथ्या षटकांत विराटने जिमीसनच्या गोलंदाजीवर चौकार वसूल केला. आणि हा विक्रम मोडला. अखेर ३५ चेंडूंत ४३ धावा करून विराट अंतिम सामन्यात बाद झाला. आणि यात त्याने एकूण ३ चौकार लगावले. इतर आयपीएल (IPL 2025) हंगामांच्या तुलनेत विराटने या हंगामात अधिक आक्रमक फलंदाजी केली आहे. एकूण हंगामात १५० च्या जवळपास स्ट्राईक रेटने त्याने धावा वाढवल्या आहेत. तर एकूण १५ सामन्यांत त्याने ६५४ धावा केल्या. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो तिसरा होता. (IPL 2025, RCB Champions)

(हेही वाचा – Netherlands मध्ये मुसलमान घुसखोरांमुळे कोसळले सरकार; युतीतील सर्वांत मोठा पक्ष सरकारमधून बाहेर)

स्पर्धेत विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आता एकूण ७७० चौकार जमा झाले आहेत. सध्या निवृत्तीचा विचार नसल्याचं त्याने बोलून दाखवलं आहे. त्यामुळे पुढील हंगामातही तो खेळतच राहणार आहे. अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडिअमची (Narendra Modi Stadium) खेळपट्टी गोलंदाजांना बऱ्यापैकी साथ देणारी होती. ती काहीशी टणक होती. त्यामुळे कमी गतीने आलेले चेंडू फलंदाजांना बुचकाळ्यात पाडत होते. आणि फटकेबाजी करणं इथं सोपं नव्हतं. त्यामुळे बंगळुरूनेही दहाव्या षटकापर्यंत आपले तीन महत्त्वाचे फलंदाज गमावले होते. तर विराटही १५ व्या षटकांत ओमारझाईच्या चेंडूवर चकला आणि त्याने हा अप्रतिम झेल टिपला. (IPL 2025, RCB Champions)

गडी बाद होत गेले तरी बंगळुरूच्या पहिल्या सातही फलंदाजांनी किमान दुहेरी आकडा गाठला. आणि पाच जणांनी किमान २५ धावा केल्या. त्यामुळे बंगळुरूचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १९० धावा करू शकला. ही धावसंख्या या खेळपट्टीवर पुरेशी ठरली. आणि कृणाल पंड्याने (Krunal Pandya) ४ षटकांत फक्त १७ धावा देत २ बळी मिळवले. आणि पंजाबला जोरदार धक्का दिला. पांड्याच्या या कामगिरीमुळे बंगळुरूला सामन्यावर नियंत्रण मिळवता आलं. (IPL 2025, RCB Champions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.