- ऋजुता लुकतुके
आयपीएलमध्ये (IPL 2025) आता बाद फेरींना सुरुवात होत आहे. आणि पहिला पात्रता ( Qualifier 1) सामना गुरुवारी रात्री पंजाबमधील मुल्लानपूर (Mullanpur) इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात रंगणार आहे. भारत – पाक तणावामुळे एक आठवडा ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली. तोपर्यंत देशात मान्सून दाखल झाला आहे. आयपीएलच्या (IPL 2025) स्थिगितीनंतरचा पहिलाच बंगळुरू वि कोलकाता सामना पावसात वाहून गेला होता. त्यानंतर पावसाची शक्यता लक्षात घेऊन आयपीएल प्रशासनाने राखीव दिवस वाढवले आहेत. पण, तरीही पहिल्या बाद सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर नियम काय सांगतो ते समजून घेऊया,
अंतिम फेरीला राखीव दिवस असला तरी पहिल्या पात्रता फेरीला राखीव दिवस नाही. त्यामुळे गुरुवारचा अख्खा दिवस पावसात वाहून गेला तर नियमाप्रमाणे गुणतालिकेत अव्वल राहिलेला संघ अंतिम फेरीत पोहोचेल. म्हणजे इथे पंजाब किंग्जचा (Punjab Kings) संघ थेट अंतिम फेरीत जाईल. पंजाब आणि बंगळुरूचे समसमान १९ गुण असले तरी पंजाबची धावगती सरस आहे. त्यामुळेच ते अव्वल स्थानावर आहेत.
(हेही वाचा – Asian Athletics Championship : आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाला ऐतिहासिक सुवर्ण)
मात्र हा पहिला पात्रता सामना असल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूलाही (RCB) दुसरी संधी मिळेल. एलिमिनेटरचा सामना शुक्रवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्या दरम्यान होणार आहे. आणि या सामन्यातील विजेत्या संघाबरोबर बंगळुरूची दुसरी पात्रता लढत होईल. तिथे जिंकून ते अंतिम फेरी गाठू शकतील.
दुसरी पात्रता लढत रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे. त्यानंतर अंतिम सामना ३ जूनला याच मैदानावर होईल. पंजाब आणि बंगळुरू या दोन्ही संघांनी आतापर्यंत आयपीएल जिंकलेली नाही. पंजाबने २०१४ तर बंगळुरूने २०१६ नंतर पहिल्यांदाच अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community