ऋजुता लुकतुके
श्रेयस अय्यरने (PBKS vs MI) ४१ चेंडूंत नाबाद ८७ धावांची खेळी करत यंदाच्या आयपीएलमधली एक अद्भूत खेळी साकारली आणि त्याबरोबरच पंजाब किंग्जला १६ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. पंजाब किंग्जनी (PBKS vs MI) मुंबईने समोर ठेवलेलं २०४ धावांचं आव्हान ५ गडी आणि ६ चेंडू राखून पार केलं.‘आताची वेळ पराभवावर चर्चा करण्याची नाही. तर पराभवातून शिकण्याची आहे,’ असं पहिल्या पात्रता फेरीत संघ सर्वबाद १०२ झाल्यावर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने बोलून दाखवलं होतं. तेव्हाही त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची धीरगंभीरता होती. आणि दुसऱ्या पात्रता सामन्यात आपलं हे वाक्य त्याने स्वत: शब्दश: खरं करून दाखवलं. (PBKS vs MI)
हेही वाचा-Ro-Ro Service : मुंबईतून लवकरच कोकणासाठी सागरी रो रो सेवा
बंगळुरू विरुद्ध फलंदाज चुकीच्या पद्धतीने बाद झाले होते. पण, इथं कठीण परिस्थितीतही त्यांनी दमदार कामगिरी केली. प्रभसिमरन सिंग (६), प्रियांश आर्या (२०) आणि जोश इंग्लिस (३८) हे तिघे दहा षटकांच्या आत बाद झाल्यानंतर पंजाबची अवस्था खरंतर ३ बाद ७२ अशी झाली होती. आणि श्रेयसचाही जम बसायचा होता. पण, डावखुऱ्या नेहल वढेराच्या साथीने आधी श्रेयसने डाव सावरला. आणि त्यानंतर ८ षटकारांची आतषबाजी करत धावगतीही आटोक्यात आणली. (PBKS vs MI)
दोघांनी चौथ्या गड्यासाठी ८४ धावांची भागिदारी केली. महत्त्वाचं म्हणजे अडचणीत असतानाही दोघांची देहबोली कधीही पराभूताची नव्हती. किंवा घाई गडबड नव्हती. वढेराने २९ चेंडूंत ४८ धावा करत श्रेयसला अत्यंत मोलाची साथ दिली. पण, दुसऱ्या बाजूने श्रेयस त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळत होता. ४१ चेंडूंत नाबाद ८७ धावा करताना त्याने ८ षटकार आणि ५ चौकार ठोकले. सामन्यावरील नियंत्रण त्याने कधीही सोडलं नाही. वढेरा बाद झाल्यावर शशांक सिंगही त्याच्याच चुकीने २ धावांवर धावचित झाला. पण, दुसऱ्या बाजूने श्रेयसने शांतपणे चौकार लगावणं सुरूच ठेवणं. आणि षटकार ठोकूनच विजयाची औपचारिकता पूर्ण केली. (PBKS vs MI)
Make way for the 𝐏𝐮𝐧𝐣𝐚𝐛 𝐊𝐢𝐧𝐠𝐬 ❤️
They are all locked in to meet #RCB for the 𝘽𝙄𝙂 𝙊𝙉𝙀 🔥 #TATAIPL | #PBKSvMI | #Qualifier2 | #TheLastMile | @PunjabKingsIPL pic.twitter.com/L6UqDoMs50
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
खरंतर मुंबईचे गोलंदाज विरुद्ध पंजाबचे फलंदाज असाच हा सामना होता. पण, यात पंजाबने सुरुवातीपासून बाजी मारली. महत्त्वाचं म्हणजे जोश इंग्लिसने बुमराच्या पहिल्याच षटकात २० धावा वसूल करून त्याला बॅकफूटवर ढकललं. बुमराच अपयशी झाल्यावर मुंबईचा बुरुजच ढासळला. ४ षटकांत बुमराने ४० धावा दिल्या. तर ट्रेंट बोल्टने आपल्या ४ षटकांत ३८ धावा दिल्या. इथेच पंजाबचा विजय स्पष्ट झाला. (PBKS vs MI)
हेही वाचा- Bangladesh मध्ये दहशतवादी होणार सत्ताधारी; निवडणूक लढवण्यास दिली परवानगी
नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दोनशे पेक्षा जास्त धावा पहिल्या डावांत झाल्या असताना १४ पैकी ११ सामने पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले होते. तर मुंबई इंडियन्सनी २०० पेक्षा जास्त धावा केल्या असताना ते आयपीएलमध्ये कधीही हरले नव्हते. पण, श्रेयस अय्यर या विक्रमांना जुमानणारा नव्हता. त्याने सगळ्या अडचणींवर मात करून पंजाबला विजयी केलं. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. (PBKS vs MI)
आता ३ जूनला याच मैदानावर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ अंतिम फेरीत आमने सामने येणार आहेत. त्यामुळे यंदा आयपीएलला नवीन विजेता मिळणार आहे. (PBKS vs MI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community