IPL 2025, PBKS in Final : ‘कोलकात्याने श्रेयसला सोडून चूक केली,’ – अंजुम चोप्रा

IPL 2025, PBKS in Final : गेल्या हंगामात श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सनी सोडचिठ्ठी दिली. 

42
IPL 2025, PBKS in Final : ‘कोलकात्याने श्रेयसला सोडून चूक केली,’ - अंजुम चोप्रा
  • ऋजुता लुकतुके

पंजाब किंग्जच्या संघासाठी शेवटचे काही सामने हे उतार चढावांचे ठरले आहेत. आयपीएलच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्येक सामन्यांत त्यांच्या कामगिरीचा लोलक वर खाली होताना दिसला. आधी मुंबई इंडियन्सचा पराभव करत त्यांनी गुणतिलकेत अव्वल स्थान पटकावलं. यासाठी सुटकेचा निश्वास सोडावा तर पहिल्या पात्रता सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १०२ धावांतच रोखलं. मग सामन्यात ८ गडी राखून दमदार विजय मिळवत त्यांनी अंतिम फेरी गाठली. पंजाबसाठी चित्र पुन्हा धुसर झालं. पण, आता दुसऱ्या पात्रता सामन्यात पुन्हा एकदा दमदार खेळ करत पंजाबचा संघही अंतिम फेरीत पोहोचला आहे. ‘एकदा झालेल्या चुका पुन्हा करायच्या नाहीत,’ हा मंत्र त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यरने त्यांना दिला आहे. (IPL 2025, PBKS in Final)

(हेही वाचा – Attack On Israel Supporters : अमेरिकेत इस्रायल समर्थकांवर हल्ला, हल्लेखोरांनी दिल्या ‘फ्री पॅलेस्टाईन’च्या घोषणा)

मुंबई इंडियन्स विरुद्ध दुसऱ्या पात्रता सामन्यांत ४१ चेंडूंत नाबाद ८७ धावा करत तर श्रेयसने दडपणाखाली कशी फलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिकच घालून दिलं आहे. तीन वेगवेगळ्या फ्रँचाईजींना मागच्या १० वर्षांत अंतिम फेरीत नेण्याची किमया श्रेयस अय्यरने साधली आहे. गेल्यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सना तर त्याने विजय मिळवून दिला. पण, तरीही कोलकाता संघाने श्रेयसला मेगा लिलावाच्या पूर्वी राखून न ठेवता मुक्त केलं. त्यानंतर पंजाबने विक्रमी २६ कोटी रुपये मोजत श्रेयसला आपल्या ताफ्यात घेतलं. त्यामुळे आता कोलकाता संघाने विजयाचं श्रेय श्रेयसला देत त्याला राखून ठेवायला हवं होतं, अशी हाकाटी सुरू झाली आहे. माजी महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्राने या वादाला टीव्ही संवादात प्रखरपणे वाचा फोडली आहे. पंजाबच्या कामगिरीचं श्रेय अंजुमने खेळाडूंची अष्टपैलू कामगिरी आणि श्रेयसच्या नेतृत्वाला दिलं. (IPL 2025, PBKS in Final)

(हेही वाचा – India Defence Export : रिलायन्स इन्फ्राची २ वर्षांत ३,००० कोटींची संरक्षण सामुग्री निर्यातीची तयारी)

‘श्रेयस अय्यरने कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही पंजाब किंग्जच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोलकाताकडे श्रेयसला राखून ठेवण्याची संधी होती. ती त्यांनी घेतली नाही. पण, श्रेयसच्या हातात एक शस्त्र होतं, चांगल्या कामगिरीचं आणि ते नाणं त्याने खणखणीत वाजवलं. श्रेयसचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेले नाही तर स्थानिक खेळाडू घेऊन त्याने फ्रँचाईजीसाठी हे यश मिळवलं आहे,’ असं अंजुम चोप्रा एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली आहे. खेळाडूचं काम कामगिरी करण्याचं असतं, निवड त्याच्या हातात नसते, असंही शेवटी अंजुम म्हणाली. भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठीच्या कसोटी संघातही श्रेयसला स्थान मिळालेलं नाही. (IPL 2025, PBKS in Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.