ऋजुता लुकतुके
मुल्लानपूरच्या पहिल्या पात्रता सामन्यात (MI vs GT) दोन्ही डावांत मिळून २०८ धावा झाल्या होत्या. शुक्रवारी एलिमिनेटर सामन्यात तब्बल ४३६ धावा झाल्या. पण, तरीही गुजरातला विजयासाठी २१ धावा कमी पडल्या. टी-२० क्रिकेटचा खेळ हा असा बेभरवशी आहे. त्यामुळेच लीगमध्ये भारत – पाक तणावामुळे स्पर्धा स्थगित होईपर्यंत अगदी निर्विवादपणे अव्वल स्थानावर असलेला गुजरातचा संघ अखेर सलग तीन पराभवांमुळे लीगबाहेर फेकला गेला आहे. पण, एलिमिनेटर सामन्यात त्यांनी प्रयत्न मात्र पुरेपूर केला. सुरुवातीला रोहीत शर्माचे तीन झेल सुटले नसते तर कदाचित निकाल त्यांच्या बाजूने लागलाही असता. (MI vs GT)
हेही वाचा-वाळू चोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांचे निर्देश
मुंबई इंडियन्सनी (MI vs GT) नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. आणि फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर रोहीत आणि जिमी बेअरस्टो यांनी दमदार सुरुवात मुंबईला करून दिली. बेअरस्टोने २२ चेंडूंत ४७ धावा केल्यावर तो बाद झाला. पण, रोहीतने मिळालेल्या जीवदानांचा फायदा उचलत ५० चेंडूंत ८१ धावा केल्या. आणि तिथेच मुंबई मोठी धावसंख्या उभारणार हे स्पष्ट झालं. शिवाय मुंबईच्या पहिल्या पाच फलंदाजांनी किमान २५ धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकांत ३ षटकार खेचत मुंबईला ५ बाद २२८ अशी विशाल धावसंख्या गाठून दिली. या लीगमध्ये आतापर्यंत फॉर्मात असलेल्या प्रसिध कृष्णाच्या ४ षटकांत मुंबईकर फलंदाजांनी ५४ धावा लुटल्या. यातच खेळपट्टीचं स्वरुप दिसून आलं. पण, त्याने २ बळीही मिळवले. (MI vs GT)
हेही वाचा- Indian Army : भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
विजयासाठी गुजरात टायटन्सला २२९ धावांची गरज होती. पण, यंदाच्या हंगामात सगळ्याच संघांना भीती वाटत होती ती साई सुदर्शनची. आणि या सामन्यातही तोच मुंबईच्या मार्गातील अडसर ठरला. पण, सुदर्शन आणि सुंदर ही जमलेली जोडी फुटली आणि मुंबईसाठी विजयाची कवाडं थोडी खुली झाली. (MI vs GT)
Two moments of brilliance ⚡️
Were these two the defining moments of the #Eliminator? 🤔
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQfph#TATAIPL | #GTvMI | #TheLastMile | @mipaltan pic.twitter.com/7hDL0s5Mye
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
गुजरातने पहिले दोन बळी ७ षटकांच्या आत ६७ धावांत गमावले होते. पण, त्यानंतर साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी जमली. ७ षटकांतच ८४ धावांची भागिदारी केली. आणि १५ व्या षटकांत दोघांनी गुजरातचं दीडशतक फलकावर लावलं. तेव्हा गुजरातचंच पारडं सामन्यात जड दिसत होतं. पण, अशावेळी रोहीत शर्माच्या जागी इम्पॅक्ट सब म्हणून आलेला अश्विनी कुमारची अचूक गोलंदाजी आणि अनुभवी जसप्रीत बुमरा तसंच ट्रेंट बोल्ट यांनी मिळवलेले बळी निर्णायक ठरले. बुमराच्या वॉशिंग्टन सुंदरच्या बळीने तर सामनाच फिरवला. आणि पाठोपाठ पहिल्यांदा या हंगामात खेळणाऱ्या रिचर्ड ग्लीसनने साई सुदर्शनला बाद केल्यावर मुंबईच्या विजयाची शक्यता निर्माण झाली. (MI vs GT)
हेही वाचा- ‘Rahul Gandhi कॅज्युअल नेता आणि बालक बुध्दी’; भाजपाने पुन्हा एकदा डिवचलं
२२९ धावांचं आव्हान कठीणच होतं. आणि दोघं बाद झाल्यावर इतरांना प्रयत्न करूनही शेवटच्या षटकांत हाणामारी जमली नाही. शिवाय मुंबईचे गोलंदाज अशावेळी यॉर्कर टाकण्यात यशस्वी झाले. गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव करून मुंबई इंडियन्सनी आता स्पर्धेत आव्हान कायम राखलं आहे. आता रविवारी त्यांची गाठ पंजाब किंग्जशी पडेल. या सामन्यातील विजेता संघ ३ जूनला अंतिम फेरीत विजेतेपदासाठी बंगळुरू संघाशी भिडेल. (MI vs GT)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community