IPL 2025 Final : आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआय करणार ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या सैनिकांचा सन्मान

IPL 2025 Final : येत्या ३ जूनला अहमदाबाद इथं आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे.

43
IPL 2025 Final : आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआय करणार ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या सैनिकांचा सन्मान
  • ऋजुता लुकतुके

यंदा आयपीएलचा अंतिम सामना येत्या ३ जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. बीसीसीआयने हा सामना देशाच्या सैन्यदलाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर अंतिम सामन्याच्या वेळी होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमात सैनिकांचा सन्मानही होणार आहे. नुकत्याच पाकिस्तानबरोबर सीमेवर झालेल्या संघर्षात भारतीय सैन्यदलाने निर्णायक भूमिका बजावली. ३ दिवसांत त्यांनी पाकिस्तानच्या सैन्याला नामोहरम केलं. ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. या कार्याचा गौरव आणि कृतज्ञता म्हणून ४५ मिनिटांचा अख्खा समारोपाचा कार्यक्रम हा सैन्यदलावरच असणार आहे. (IPL 2025 Final)

(हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी तन्मयतेने ऐकले ‘अनादी मी अवध्य मी’ हिंदी अनुवादित गीत)

‘भारतीय सैन्यदलाचं शौर्य, धैर्य आणि बलिदान यासाठी बीसीसीआय त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान सैन्यदलाने बजावलेल्या कामगिरीमुळे भारतीय जनता सुरक्षित आणि प्रेरित आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून अंतिम सामन्यातील समारोपाचा कार्यक्रमात सैन्यदलाला मानवंदना देण्यात येणार आहे. तसंच त्यांचा गौरव केला जाणार आहे. क्रिकेटवर अख्ख्या देशाचं प्रेम आहे. देशाचं सार्वभौमत्व, एकोपा आणि सुरक्षा याहून मोठं काहीही नाही. ते अबाधित राखल्याबद्दल भारतीय सैन्यदलाचे आम्ही आभारी आहोत,’ असं बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटलं आहे. (IPL 2025 Final)

(हेही वाचा – Income Tax Return : आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत यंदा १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली; जूनमध्ये उघडणार नवीन पोर्टल)

अंतिम सामन्यासाठी तीनही सैन्यदलांतील मोठ्या अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच मैदानातील काही स्टँड हे सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. सामन्यादरम्यान देशभक्तीपर गाणीच लावली जातील. इतकंच नाही तर समारोपाच्या सोहळ्यात सैन्यदलाचं पथकही आपला वाद्यवृंद सादर करणार आहे. २३ एप्रिलला काश्मीरमधील पहलगाममघ्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. त्याअंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी केंद्रांवर सर्जिकल स्ट्राईक केला. तेव्हापासून पुढचे तीन दिवस सीमेवर तणाव होता. अखेर युद्धबंदीनंतर हा तणाव संपला. पण, या कारवाईत भारतीय सैन्याने आणि भारताच्या ताफ्यातील ब्राम्होस क्षेपणास्त्र आणि राफेल विमानांनी भरीव कामगिरी बजावली. (IPL 2025 Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.