
-
ऋजुता लुकतुके
टेनिसमधील सांघिक स्पर्धा डेव्हिस चषकाच्या आशिया गटातील लढती सध्या सुरू आहेत. १६ वर्षांखालील गटात भारताचा मुकाबला नुकताच पाकिस्तानशी कझाकिस्तान इथं झाला. आशियाई गटांत अकराव्या आणि बाराव्या स्थानासाठी झालेल्या सामन्यांत भारताने पाकचा २-० ने पराभव केला. या सामन्यात भारताकडून झालेला पराभवही पाक खेळाडूला रुचला नसल्याचं दिसलं. या युवा पाक खेळाडूने मैदानावरच राडा घातला आणि अखिलाडू वृत्तीचं प्रदर्शन घडवलं. (Indo – Pak Tension)
भारताच्या प्रकाश शरन आणि ताविष पाहवा यांनी संघाला विजय मिळवून दिले. दुसरा एकेरी सामना संपताना पाकिस्तानच्या खेळाडूने हस्तांदोलनालाही नकार दिला. त्याने एकदा सोडून दोनदा हात झटकले. तो भारतीय खेळाडूकडे न पाहता तिथून निघून गेला. त्याचं वर्तन हे खिलाडू वृत्तीच्या विरोधात आणि प्रतिस्पर्ध्यासाठी अवमानकारक असल्याचं बोललं जातंय. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. (Indo – Pak Tension)
(हेही वाचा – Operation Sindoor : आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, म्हणाले…)
🇮🇳 India – 🇵🇰 Pakistan Handshake Drama at the Junior Davis Cup in Kazakhstan
India beat Pakistan 2-0 pic.twitter.com/mI85JBETCo
— Indian Tennis Daily (ITD) (@IndTennisDaily) May 27, 2025
BREAKING🚨:India defeats Pakistan 2-0 in Junior Davis Cup
See how Pakistani player showing attitude in hand shake.
They deserve the treatment which we give them🔥🔥🔥time to time.@DavisCup@toisports#JuniorDavisCup#Sports #India #Pakistan pic.twitter.com/Ue9JGWKIUB— Bihar Buzz (@buzz_bihar) May 27, 2025
India defeats Pakistan 2-0 in Junior #DavisCup
Look at the Pakistan player’s attitude on the handshake after losing!
pic.twitter.com/U5gqvRlwvf— The-Pulse (@ThePulseIndia) May 27, 2025
(हेही वाचा – …तर आम्ही Rahul Gandhi यांच्या तोंडाला काळे फासू; उबाठा नेत्याने दिला इशारा)
डेव्हिस चषकात भारताच्या युवा खेळाडूंची कामगिरी संमिश्र झाली आहे. न्यूझीलंडकडून १-२ ने झालेल्या पराभवामुळे भारताला पहिल्या दहांत स्थान मिळवता आलं नाही. नंतर लगेचच पाकिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे भारताने आता अकरावं स्थान पटकावलं आहे. (Indo – Pak Tension)
भारत आणि पाकिस्तानमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला सीमेवर तणाव निर्माण झाला होता. काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटक मारले गेले. त्यानंतर पंधरा दिवसांनी भारताने याला प्रत्त्युत्तर म्हणून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी केंद्रांवर सर्जिकल स्ट्राईक केला. त्यानंतर तीन दिवस सीमेवर तणाव निर्माण झाला होता. युद्धबंदीनंतर आता परिस्थिती निवळली असली तरी उभय देशांमधील क्रीडा संबंधांमध्येही आता तणाव निर्माण झाला आहे. खासकरून क्रिकेट, हॉकी या सांघिक खेळांमध्ये द्विपक्षीय मालिका किंवा एकमेकांच्या देशांचे दौरे आता कठीण होणार आहेत. (Indo – Pak Tension)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community