-
ऋजुता लुकतुके
भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याला आणखी सात दिवसांत सुरुवात होणार आहे. भारताच्या तुलनेनं नवख्या संघाची मोठी परीक्षा या मालिकेत होणार आहे. पहिल्या कसोटीसाठीचा संघ कसा असावा यावर आता चर्चा सुरू आहे. भारताचे माजी फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी फलंदाजीचा क्रम कसा असावा यावर एका कार्यक्रमात भाष्य केलं आहे. मुंबईकर शार्दूल ठाकूरला त्यांच्या संघात सध्या जागा नाही. तर अभिमन्यू ईश्वरनला तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून त्यांनी निवडलं आहे. (India Tour of England)
एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना बांगर म्हणतात, ‘माझा संघ यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, करुण नायर, नितिश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह असा असेल,’ जिओस्टार वाहिनीवरील कार्यक्रमात बांगर यांनी हे मत नोंदवलं आहे. (India Tour of England)
(हेही वाचा – Redevelopment : कामाठीपुरातील विकासाचा मार्ग मोकळा; ८००१ भाडेकरू आणि ८०० जमीन मालकांच्या स्वप्नांना पंख फुटणार)
संघात शार्दूल ऐवजी नितिशला स्थान देण्यावरून ते म्हणतात, ‘नितिश माझ्यासाठी असा फलंदाज आहे जो थोडीफार गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे फलंदाजीला मी जास्त महत्त्व देतोय. त्याने थोडी षटकं टाकून बुमराह आणि प्रभृतींचा भारही थोडा कमी करावा. पण, फलंदाजीत आपलं पूर्ण योगदान द्यावं. त्यामुळे शार्दूलच्या पुढे मी नितिशला प्राधान्य देईन,’ असं बांगर म्हणतात. (India Tour of England)
भारतीय संघ ७ जूनला इंग्लंडला पोहोचला आणि तेव्हापासून खेळाडूंनी कठोर सरावाला सुरुवात केली आहे. खासकरून फलंदाजीवर संघाने लक्ष केंद्रीत केलं आहे. कारण, इंग्लिश वातावरणात लॉर्ड्स, एजबॅस्टन आणि ओल्ड ट्रॅफर्ड इथं स्विंग आणि अनियमित उसळी यांचा सामना फलंदाजांना करावा लागेल. पहिली कसोटी २० तारखेपासून हेडिंग्ले म्हणजेच लीड्स मैदानावर सुरू होईल. त्यानंतर पुडील कसोटी सामने एजबॅस्टन, लॉर्ड्स, मँचेस्टर आणि ओव्हल इथं होणार आहेत. (India Tour of England)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community