-
ऋजुता लुकतुके
लॉर्ड ठाकूर अशी ओळख असलेला शार्दुल ठाकूर दोन वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात परतला आहे. इंग्लंडमध्ये यापूर्वी यशस्वी ठरलेल्या या तेज गोलंदाजाची आता आवडत्या खेळपट्टीवर पुन्हा कसोटी लागणार आहे. सध्या तो भारतीय ए संघाकडून खेळत आहे. संघातील बदलांबद्गल त्याने सावध प्रतिक्रिया दिली आहे. नवीन कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार रिषभ पंत यांना तो भारतीय संघाचं भविष्य म्हणतो. ‘ते दोघेही मोठे खेळाडू आहेत आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य आहेत,’ असं शार्दुलने बोलून दाखवलं आहे. (India Tour of England)
३३ वर्षीय गोलंदाज म्हणाला – गिल आणि पंत यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. गिल शांत आणि गंभीर स्वभावाचा आहे, तर पंत खेळकर स्वभावाचा आहे. हे देखील त्या दोघांचे एक वैशिष्ट्य आहे. याशिवाय ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची पोकळी जाणवणार असल्याचंही तो म्हणाला आहे. २४ मे रोजी बीसीसीआयने शुभमन गिलची भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. तर, ऋषभ पंतला या संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले. (India Tour of England)
(हेही वाचा – India A vs England Lions : इंग्लंड लायन्स विरुद्ध सर्फराझ खानची दमदार फलंदाजी; ११३ चेंडूंत ९२ धावा)
रोहित-कोहलीच्या निवृत्तीवर शार्दुल म्हणाला – ‘ड्रेसिंग रूममधील सर्वांना रोहित आणि कोहलीची आठवण येईल. दोघेही कसोटी क्रिकेटला पुढे नेत होते, परंतु जेव्हा एखाद्या खेळाडूला वाटते की तो पूर्वीइतके योगदान देऊ शकणार नाही तेव्हा निवृत्ती हा वैयक्तिक निर्णय असतो, असंही शार्दुल पुढे म्हणाला. दोघांमुळे ड्रेसिंग रुममध्ये सुरक्षिततेची भावना होती, असंही त्याचं म्हणणं आहे. (India Tour of England)
‘जेव्हा वरिष्ठ खेळाडू तुमच्याभोवती असतात तेव्हा तुम्हाला सुरक्षित वाटते. आता आम्ही नवीन नेतृत्वासोबत खेळू. त्यांना वेगवेगळी आव्हाने असतील. प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारी असेल. मार्गदर्शकांची कमतरता असेल, आता सर्वात वरिष्ठ मार्गदर्शक जडेजा असेल, असं शार्दुल म्हणाला. विराट कोहलीने १२ मे रोजी आणि रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. (India Tour of England)
(हेही वाचा – Indian Delegations : पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या कोलंबियाने ‘ते’ विधान घेतलं मागे; शिष्टमंडळाच्या भेटीनंतर स्पष्ट केली भूमिका)
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात शार्दुल ठाकूरची निवड झाली आहे. तो १७ महिन्यांनंतर कसोटी संघात परतला आहे. शार्दुलने डिसेंबर २०२३ मध्ये सेंच्युरियनमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला. त्या सामन्यात शार्दुलला फक्त एकच बळी घेता आला. दक्षिण आफ्रिकेने तो सामना एक डाव आणि ३२ धावांनी जिंकला. २ सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. (India Tour of England)
या मालिकेनंतर, शार्दुलला दुखापत झाली आणि त्याला इंग्लंडच्या भारत दौऱ्यातून बाहेर राहावे लागले. त्यानंतर तो बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघाचा भाग नव्हता. पण, आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी करून तो राष्ट्रीय संघात परतला आहे. (India Tour of England)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community