-
ऋजुता लुकतुके
कसोटी मालिका असेल आणि खासकरून परदेशातील तर जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील मुख्य अस्त्र आहे हे तर नक्कीच. पण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीनंतर बुमराह सलग ५ कसोटी खेळू शकेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संघाचा कर्णधार म्हणूनही त्याचा विचार झाला नाही. आता इंग्लंडचा दौरा जवळ आला आहे. खरंच बुमराह किती कसोटी खेळेल यावर चर्चा सुरू असताना थेट मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेच यावर उत्तर दिलं आहे. (India Tour of England)
(हेही वाचा – IPL 2025, RCB Champions : विराटच्या आईने असा केला बंगळुरू विजयाचा आनंद साजरा)
‘कोणत्या तीन कसोटी तो खेळेल याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. मालिकेचा निकाल कसा लागतो, काय परिस्थिती असेल आणि त्याची स्वत:ची तंदुरुस्ती याचा विचार करून मालिकेदरम्यान आम्ही त्यावर निर्णय घेऊ,’ असं गंभीर स्पष्टपणे म्हणाला. म्हणजेच बुमराह तीनच कसोटी खेळेल हे स्पष्ट आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णन, शार्दूल ठाकूर आणि हर्षित राणावर तेज गोलंदाजीची धुरा असेल. त्याचबरोबर बुमराहची जागा घेणं तसं सोपं नसेल, असंही त्याने बोलून दाखवलं. (India Tour of England)
(हेही वाचा – Railway Accident : प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर; धावत्या ट्रेनमधून पडून एकाने गमावला हात)
‘बुमराहची जागा कुणीच घेऊ शकत नाही, याची आम्हाला कल्पना आहे. पण, आमच्याकडे कुशल गोलंदाज आहेत आणि त्यांच्यासाठी ही एक संधी असेल चांगली कामगिरी करून दाखवण्याची. चॅम्पियन्स करंडकातही त्यांना ही संधी मिळाली. आणि युवा खेळाडूंनी ते करूनही दाखवलं,’ असं गंभीर यावर बोलताना म्हणाला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी निवृत्तीनंतर भारतीय संघासाठी ही पहिली परदेशी मालिका आहे. या मालिकेनं २०२६-२७ चं कसोटी अजिंक्यपदाचं चक्रही सुरू होत आहे. रोहितच्या अनुपस्थितीत युवा शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. फलंदाजांची ताज्या दमाची फळी या मालिकेत खेळेल. हेडिंग्ले, एडबॅस्टन, लॉर्ड्स, ओल्ड ट्रॅफर्ड आणि ओव्हल इथं पाच कसोटी सामने होणार आहेत. (India Tour of England)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community