-
ऋजुता लुकतुके
नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी खेळायला सज्ज होत आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीत भारताचा कस लागणार आहे. भारतीय संघ अननुभवी असला तरी दक्षिण आफ्रिकेचा माजी तेज गोलंदाज डेल स्टेनला (Dale Steyn) ही मालिका रंगतदार होईल असं वाटतं. इतकंच नाही तर त्याने निकालाचाही अंदाज वर्तवला आहे. ‘सगळ्या कसोटी अटीतटीच्या होतील. पण, इंग्लिश संघ ३-२ ने जिंकेल,’ असं स्टेन म्हणतो.
कोणत्याही संघाला अगदी आरामात विजय मिळणार नाही. पण, प्रत्येक सामना निकाली निघेल, असं स्टेनने विश्वासाने सांगितलं आहे. ‘५ कसोटींची मालिका होतेय म्हणूनच मी खुश आहे. कसोटी क्रिकेट जगलं पाहिजे. त्यासाठी या मालिका महत्त्वाच्या आहेत. भारत आणि इंग्लंड हे दोन्ही देश क्रिकेटवर प्रेम करणारे आहेत. आता ही मालिकाही रंगेल. आणि निकाल कदाचित शेवटच्या कसोटीतच ठरेल. सर्व सामने रंगतील. आणि ते क्रिकेटसाठी महत्त्वाचं आहे,’ असं स्टेन जिओ-हॉटस्टारवर बोलताना म्हणाला. (India Tour of England)
(हेही वाचा – Arvind Vitthal Kulkarni : ज्येष्ठ हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचे निधन)
शुभमन गिल (Shubman Gill) पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर उपकप्तान ऋषभ पंत असेल. नवीन कप्तानाने पहिल्यांदा इंग्लंडमध्ये भारताचं नेतृत्व करण्याला एक इतिहास आहे. यापूर्वी १९७१, १९८६, २००७ मध्ये भारतीय संघाने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकल्या आहेत. अजिंत वाडेकर (Ajit Wadekar), कपिल देव (Kapil Dev) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) हे तेव्हाचे कर्णधार होते. आणि योगायोग हा की, या तिघांचीही कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका होती. हा इतिहास शुभमन गिलला (Shubman Gill) नक्कीच उमेद देणारा असेल. मागच्या १०० वर्षांत भारताने फक्त तीनदा इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. (India Tour of England)
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ,
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, करुण नायर, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, नितिश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाशदीप व अर्शदीप सिंग
हेही पहा –
Join Our WhatsApp Community