-
ऋजुता लुकतुके
आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सलग तीन वर्ष नवीन विजेता मिळाला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानंतर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेनं कसोटीत अजिंक्यपदाची गदा पटकावली आहे. अंतिम स्पर्धा रंगतदार झाली आणि प्रेक्षकांचाही तिला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादामुळे आयसीसी सुखावली आहे आणि कसोटीला तरुणांचा अधिकाधिक पाठिंबा मिळावा यासाठी आयसीसीने प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी कसोटी सामना ५ नाही तर ४ दिवसांचा असावा असा एक प्रस्ताव आहे. आयसीसीने तत्त्वत: या प्रस्तावाला मान्यताही दिली आहे. (ICC Test Format)
यामुळे एका अजिंक्यपदाच्या चक्रात आणखी कसोटी सामने खेळवता येतील आणि मालिकाही मोठ्या होतील. देशांना जास्त कसोटी खेळता येतील, असं आयसीसीला वाटतंय. सध्या २०२५ पासूनच लहान देशांमध्ये होणाऱ्या कसोटी या ४ दिवसांच्या असतील. तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे देश आताही ५ दिवसांच्या कसोटी खेळतील. आयसीसीने या दिशेनं निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. (ICC Test Format)
(हेही वाचा – Pandharpur Wari : पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिस तैनात ; साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस)
“𝑰 𝒄𝒐𝒖𝒍𝒅𝒏’𝒕 𝒔𝒍𝒆𝒆𝒑”
Lungi Ngidi recollects the tense moments leading up to South Africa’s #WTC25 glory at Lord’s 🤩 pic.twitter.com/QwPiyJ8V8S
— ICC (@ICC) June 17, 2025
‘द गार्डियन’ वृत्तपत्रातील एका वृत्तात म्हटले आहे की, ‘गेल्या आठवड्यात लॉर्ड्स येथे झालेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान, आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी २०२७-२९ डब्ल्यूटीसी सायकलसाठी चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना पाठिंबा दर्शविला आहे. अंतिम सामन्यादरम्यान यावर चर्चा करण्यात आली जेणेकरून नियम वेळेत मंजूर करता येईल आणि त्यासाठी नियम बनवता येतील. (ICC Test Format)
त्यात म्हटले आहे की, ‘इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांना अजूनही अॅशेस, बॉर्डर – गावस्कर चषक आणि अँडरसन – तेंडुलकर चषकासाठी पाच दिवसांच्या कसोटी मालिकेत खेळण्याची परवानगी असेल. अँडरसन – तेंडुलकर करंडकात शुक्रवारी हेडिंग्ले येथे इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याने सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे. (ICC Test Format)
अहवालानुसार, ‘वेळ आणि खर्चामुळे अनेक लहान देश कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यास टाळाटाळ करतात, परंतु चार दिवसांच्या क्रिकेटकडे वाटचाल केल्याने संपूर्ण तीन कसोटी मालिका तीन आठवड्यांपेक्षा कमी वेळात खेळता येईल.’ अहवालात म्हटले आहे की, ‘चार दिवसांच्या कसोटी सामन्यांमध्ये वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी, एका दिवसातील खेळण्याची वेळ दररोज किमान ९८ षटके केली जाईल. सध्याच्या पाच दिवसांच्या कसोटीत, एका दिवसात जास्तीत जास्त ९० षटके टाकली जातात. (ICC Test Format)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community