-
ऋजुता लुकतुके
आयसीसी क्रिकेटमधील काही नियमांमध्ये जून महिन्यापासून बदल करणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेनं नवीन कसोटी अजिंक्यपद चक्राला सुरुवात होत आहे. तेव्हापासूनच कसोटीतील नवीन नियम अंमलात येतील. तर जुलै महिन्यापासून एकदिवसीय आणि टी-२० प्रकारातील नियमही लागू होतील. सगळ्यात महत्त्वाचा बदल एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन नवीन चेंडूंच्या वापराच्या बाबतीत होणार आहे. (ICC Rule Change)
दोन्ही बाजूंनी नवीन चेंडू वापरण्याची पद्धत हळूहळू बंद होईल. तर सामन्यांत दोन नवीन चेंडू वापरले तरी ते एकाच वेळी वापरले जाणार नाहीत. म्हणजे डावाच्या सुरुवातीला पहिला नवीन चेंडू आणि तो ३४ व्या षटकात बदलण्यात येईल. हा नियम जुलै महिन्यापासून लागू होईल. हे नियम आयसीसीने सर्व सदस्य देशांना कळवले आहेत. ‘एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुरुवातीला दोन नवीन चेंडू वापरण्यात येतील. ३४ व्या षटकांत गोलंदाजी करणाऱ्या संघाला यातील एक चेंडू निवडण्याची मुभा असेल. हा चेंडू मग उर्वरित १६ षटकांमध्ये वापरला जाईल,’ असं आयसीसीने नियमांत म्हटलं आहे. (ICC Rule Change)
(हेही वाचा – IPL 2025, PBKS in Final : ‘कोलकात्याने श्रेयसला सोडून चूक केली,’ – अंजुम चोप्रा)
पण, पाऊस किंवा इतर कुठल्याही अडथळ्यामुळे सामन्यातील २५ षटकं कमी करण्यात आली तर मात्र एकच चेंडू गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळेल. चेंडू बदलण्याच्या बाबतीत मात्र नियम तोच आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार पंचांना चेंडू बदलण्याची विनंती करू शकतो. ती मान्य करायची की नाही, हे पंच चेंडू पाहून ठरवतील. खेळाडूच्या डोक्यावर चेंडू बसला तर अशा खेळाडूसाठी बदली खेळाडू संघाला मिळू शकतो. कारण, डोक्याला झालेली दुखापत गंभीर ठरू शकते, त्यामुळे अशा खेळाडूला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी हा नियम आखण्यात आला आहे. (ICC Rule Change)
या नियमानुसार, बदली खेळाडू कसा असावा यावर आता आयसीसीने सविस्तर वक्तव्य केलं आहे. जो खेळाडू बाद होईल त्या खेळाडूचीच कौशल्य असलेला खेळाडू संघाला बदली खेळाडू म्हणून निवडता येईल. एकदिवसीय आणि टी-२० मधील बदललेले नियम श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दरम्यानच्या मालिकेत पहिल्यांदा लागू होतील. (ICC Rule Change)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community