BCCI After Bengaluru Stampede : विजयोत्सवासाठीचे नियम करणार कडक; बीसीसीआयचा विचार सुरू

BCCI After Bengaluru Stampede : बंगळुरूत आयपीएल विजयानंतर चेंगराचेंगरी झाली होती. 

54
BCCI After Bengaluru Stampede : विजयोत्सवासाठीचे नियम करणार कडक; बीसीसीआयचा विचार सुरू
  • ऋजुता लुकतुके

यंदा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विजय झाल्यानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या विजयोत्सवादरम्यान चेंगराचेंगरी होऊन किमान ११ जणांचा मृत्यू ओढवला होता. त्यानंतर कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि बंगळुरू फ्रँचाईजी यांच्यावर टीका होत आहे. या गोष्टींची आता बीसीसीआयनेही दखल घेतली असून विजेतेपदानंतर विजयोत्सवाचेही काही नियम असावेत यावर विचार सुरू झाला आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर कुठलीही कारवाई किंवा निलंबन होण्याची शक्यता मात्र बीसीसीआयमधील सूत्रांनी फेटाळून लावली आहे. (BCCI After Bengaluru Stampede)

(हेही वाचा – Ahmedabad plane crash : मुलाची भेट राहूनच गेली; सांगोल्यातील दांपत्याची व्यथा)

बीसीसीआयने शनिवारी एक तातडीची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत बंगळुरूतील घटनेवर चर्चा होणार आहे. त्याचवेळी अशा घटना पुढे घडू नयेत यासाठी करायच्या उपाययोजनांवरही चर्चा होईल. ३ जूनला आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबाद इथं पार पडला. बंगळुरू फ्रँचाईजीने ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर विजयोत्सव आयोजित केला होता. मैदानाची क्षमता ३०,००० ते ३५,००० प्रेक्षकांची असताना विजयोत्सवासाठी मैदानाबाहेर १ लाखांच्या वर लोक जमले. त्यांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तीन दरवाजांवर प्रचंड चेंगराचेंगरी झाली आणि ११ लोकांचा यात मृत्यू झाला. (BCCI After Bengaluru Stampede)

(हेही वाचा – Israel attacks Iran : इस्राइलच्या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारी, परमाणु शास्त्रज्ञ ठार)

‘अशा प्रकारच्या दुर्घटना कशा टाळता येतील, यावर आम्ही चर्चा करू. अशा घटना टाळण्यासाठी काय करावं लागेल हा बैठकीचा मुख्य मुद्दा असेल. त्यानुसार, विजयोत्सवासाठीही काही मार्गदर्शक तत्त्व किंवा नियम आखण्याचा आम्ही प्रयत्न करू. ही चर्चा सकारात्मक व्हावी आणि त्यातून काहीतरी तोडगा निघावा असा आमचा प्रयत्न आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. या महत्त्वाच्या मुद्याबरोबरच खेळाडू परदेश दौऱ्यावर असतानाची आचार संहिता आणि वय चोरीचे वाढते प्रकार यावरही या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर बीसीसीआयने खेळाडूंसाठी आचारसंहिता लागू केली आहे. परदेश दौऱ्यावर कुटुंबीयांना ठरावीक काळच बरोबर ठेवता येणार आहे. त्यामुळे रोहित आणि विराटसह अनेक खेळाडू या नियमांवर नाराज आहेत. त्यामुळे या आचारसंहितेवर पुन्हा एकदा चर्चा अपेक्षित आहे. (BCCI After Bengaluru Stampede)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.