
-
ऋजुता लुकतुके
सईदा खातुन उर्फ राणी हमिद या बांगलादेशमधील जागतिक दर्जाच्या लोकप्रिय बुद्धिबळपटू आहेत. त्या सध्या दिल्ली आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतात आल्या आहेत. पण, त्यांची साथीदार आणि सहप्रवासी आशिया सुलताना यांना विमानतळावरच भारताने प्रवेश नाकारला आणि बांगलादेशला परत पाठवलं. ही गोष्ट तशी ३-४ दिवस जुनी आहे. पण, हमिद यांच्या वक्तव्यांमुळे ही गोष्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे. राणी हमिद ८० वर्षांच्या आहेत आणि झाल्या प्रकारामुळे क्लेश झाले असून पराभवासाठी हीच गोष्ट जबाबदार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. (Bangladesh Player Deported)
३७ वर्षीय सुलताना स्पर्धेत सहभागासाठी ढाक्याहून दिल्लीत आल्या होत्या. पण, भारताच्या परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाने सुलताना यांना भारतात प्रवेश नाकारला. त्यांच्यावर यापूर्वी व्हिसा नियमांचं उल्लंघन करण्याचा ठपका भारताने ठेवला आहे. यापूर्वी त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी व्हिसा देण्यात आला होता. पण, त्या व्हिसावर त्या कोलकाता इथं एक स्पर्धा खेळण्यासाठी गेल्या. हे व्हिसा नियमांचं उल्लंघन आहे. त्यामुळे भारताने ही कारवाई केली. (Bangladesh Player Deported)
(हेही वाचा – Virat Kohli : ‘विराट कोहलीची निवृत्ती संवेदनशीलतेनं हाताळायला हवी होती,’ – रवी शास्त्री)
सुलताना नवी दिल्लीत पोहोचल्या तेव्हा इमिग्रेशन विभागाने त्यांना रोखलं. त्यांना त्याचं सामानही मिळू दिलं नाही आणि अखेर ढाक्याला परत पाठवण्यात आलं. या गोष्टीचा आपल्यावर खोल परिणाम झाल्याचं राणी हमिद यांनी आता म्हटलं आहे. ‘मी दु:खी आहे. माझ्या मैत्रिणीला दिल्ली विमानतळावर रात्रभर बसवून ठेवण्यात आलं. तिचं सामान तिला मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी दुप्पट पैसे मोजून तिला परतीचं तिकीट काढावं लागलं. माझं लक्ष त्यामुळे विचलित झालं आहे,’ असं हमिद टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलताना म्हणाल्या. (Bangladesh Player Deported)
हमिद या महिला बुद्धिबळातील मोठं नाव आहे. त्यांचं रेटिंग १८०० इतकं तगडं आहे. पण, वय ८० च्याही पुढे असल्यामुळे त्या एकट्या प्रवास करत नाहीत. त्यामुळे त्या आशिया सुलतानावर अवलंबून होत्या. पण, त्यांना विमानतळावर रोखल्यामुळे राणी हमिद एकाकी पडल्या आहेत. स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीवर त्याचा लक्षणीय परिणाम झाला आहे. ६ सामन्यांमध्ये त्यांना अवघा एक डाव जिंकता आला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांच्या तुलनेत खूपच नवखे असताना ही वेळ त्यांच्यावर आली आहे. राणी हमिद बांगलादेशच्या अव्वल बुद्धिबळपटू आहेत. १९८५ साली आंतरारष्ट्रीय ग्रँडमास्टर किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या बांगलादेशी महिला बुद्धिबळपटू होत्या. (Bangladesh Player Deported)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community