Jammu Kashmir : भारतीय लष्कराकडून लष्कर-ए-तोएबाच्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा

95
Jammu Kashmir : भारतीय लष्कराकडून लष्कर-ए-तोएबाच्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) कुलगाम सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली, यात भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. सैन्य दलाने लष्कर-ए-तोएबाच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोहिम हाती घेतली आहे, यामध्ये पोलिसांच्या मदतीने सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे.

(हेही वाचा – Lower Parel : आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल, मुंबई महापालिकेने केली तक्रार, काय आहे प्रकरण?)

कुलगाम पोलिसांनी सांगितलं की, कुलगामच्या (Jammu Kashmir) नेहामा गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी गावाला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सैन्य दलावर गोळीबार केला, ज्यामध्ये पाच दहशतवादी मारले गेले आहेत. समीर अहमद शेख, यासिर बिलाल भट, दानिश अहमद ठोकर, हंजुल्ला याकुब शाह आणि उबेद अहमद पदर ही मृत दहशतवाद्यांची नावे आहेत. (Jammu Kashmir)

(हेही वाचा – LPG Price : व्यावसायिकांना दिलासा, दिल्लीपासून मुंबईपर्यंत एलपीजी चे काय आहेत नवे दर)

पोलिसांनी पुढे सांगितलं की, मारले गेलेले दहशतवादी (Jammu Kashmir) नागरिकांवरील अत्याचारांसह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांकडून चार एके-रायफल, चार ग्रेनेड आणि दोन पिस्तुलांसह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. (Jammu Kashmir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.