शीख धर्मगुरु Arjun Dev यांचा मोगलांनी केला होता क्रूर छळ

Sikh Guru Arjun Dev यांना गरम तव्यावर बसवून तप्त वाळू टाकली, साखळदंडांनी बांधून रावी नदीत फेकले, मुघलांच्या या क्रूरतेने तुम्ही संतापून जाल. 

50

‘तेरा कीआ मीठा लागे॥ हरि नामु पदारथ नानक मांगे॥’ म्हणजे जे काही घडत आहे ते सर्व ईश्वराच्या इच्छेने घडत आहे. तुमची कर्मे मला मधुर वाटतात, नानक भगवंताच्या नावाच्या संपत्तीसाठी तळमळतात. हे वचन शीखांचे पाचवे गुरु अर्जन देव (Arjun Dev) यांचे आहे, जेव्हा मुघल बादशाह जहांगीर (Mughal Emperor Jahangir) त्यांच्यावर तापलेली वाळू टाकून क्रूरता करत होता. गुरु साहिबांची ही कहाणी ऐकून तुम्हाला रडू कोसळेल. (Sikh Guru Arjun Dev)

(हेही वाचा – भारत-नेपाळ सीमेवर China मुले बनवत होते व्हिडिओ; फोनमध्ये आढळला खलिस्तानी मजकूर )

गुरु रामदास जी आणि माता भानी जी यांचे सर्वात धाकटे पुत्र गुरु अर्जन देव जी यांचा जन्म १५ एप्रिल १५६३ रोजी गोइंदवाल साहिब येथे झाला होता. त्यांनी बाबा बुद्धा यांच्याकडून गुरुमुखी लिपी आणि गुरबानी शिकली. त्यांना फारसी, हिंदी आणि संस्कृत भाषांमध्येही शिक्षण देण्यात आले होते. लहानपणी अर्जन साहिब नेहमी देवाविषयी बोलत असत आणि त्यांची गाणी म्हणायला त्यांना आवडत असे. आज हुतात्मा दिनानिमित्त जाणून घेऊया – गुरु अर्जन देव यांच्या त्याग, बलिदान आणि शौर्याची कहाणी.

 स्वर्ण मंदिराची पायाभरणी 

शीख धर्माचे पहिले हुतात्मा गुरु अर्जन देव यांचा विवाह माता गंगा जी यांच्याशी झाला. त्यांना एक पुत्र झाला, ज्याचे नाव हरगोविंद सिंह होते, जे नंतर शिखांचे सहावे गुरु बनले. गुरु अर्जन देव यांनी १६०४ मध्ये अमृतसरमध्ये (Amritsar) हरमंदिर साहिब गुरुद्वाराची पायाभरणी केली. हा गुरुद्वारा आज स्वर्ण मंदिर (Golden Temple) म्हणून ओळखला जातो. यासोबतच याला शीख धर्माचे सर्वात पवित्र स्थानही मानले जाते.

अर्जन देवजी मधुर, विनम्र आणि भक्ती व त्यागाचे योग्य मिश्रण होते. जेव्हा त्यांचे वडील गुरु रामदास जी यांनी त्यांना पाचवे नानक म्हणून स्थापित केले तेव्हा ते १८ वर्षांचे होते. त्यांनी लाहोरचे एक मुस्लिम संत हजरत मियाँ मीर यांच्याकडून हरमंदिर साहिबची पायाभरणी करवून घेतली. हरमंदिर साहिब पूर्ण झाल्यानंतर गुरु साहिब यांनी संतोखसरचे बांधकाम पूर्ण केले.

गुरु ग्रंथ साहिबचे संकलन 

गुरु अर्जन देव यांनी शीख धर्म मजबूत करण्यासाठी पाच वर्षे भारतभर प्रवास केला. त्यांनी पहिल्या चार गुरु साहिबांचे आणि इतर अनेक हिंदू व मुस्लिम संतांचे दोहे एकत्र करून श्री गुरु ग्रंथ साहिबचे संकलन केले. गुरु साहिबांनी स्वतः यासाठी सुमारे २००० श्लोक लिहिले. ते श्री हरमंदिर साहिबमध्ये स्थापित केले आणि बाबा बुद्धा जी यांना पहिले ग्रंथी बनवले. त्यांनी सुखमनी साहिबचीही रचना केली, ज्यात चोवीस अष्टपदी आहेत. सुखमनी साहिब हे राग गाउडीमध्ये रचलेले एक काव्य आहे.

मोगलांनी ओलांडली क्रूरतेची सीमा

गुरु अर्जन देव ( Sikh Guru Arjun Dev) यांच्यावर मुघलांनी क्रूरतेची सीमा ओलांडली. त्यांना गरम तव्यावर बसवले. त्यांच्यावर गरम वाळू आणि तेल टाकले गेले. अशाप्रकारे त्यांना पाच दिवस सतत यातना देण्यात आल्या. या यातनांचा त्यांच्यावर इतका भयंकर परिणाम झाला की, ते बेशुद्ध झाले. तरीही ते मुघलांपुढे झुकले नाहीत. यानंतर जहांगीरने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडत अर्जन देव यांच्या शरीराला साखळदंडांनी बांधून पाकिस्तानच्या लाहोरमधील रावी नदीत फेकले. ही घटना ३० मे १६०६ रोजी घडली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.